महाराष्ट्र बातम्या

विजेच्या मागणीचा ट्रेंड सकाळकडून संध्याकाळकडे 

किरण कारंडे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात ऑक्‍टोबरमधील विजेची सर्वाधिक मागणी सकाळी होत होती. यंदा मात्र हा ट्रेंड बदलून संध्याकाळी मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

सायंकाळी विजेची मागणी वाढण्यामागे शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याचे वाढलेले तास कारणीभूत आहेत. शेतीपंपाला 12 तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. 

गेल्या वर्षी 23 ऑक्‍टोबरला 18,250 मेगावॉट विजेची मागणी होती. त्या वेळी महावितरणने 18 हजार मेगावॉटपर्यंत वीज पुरवली होती. यंदा विजेची मागणी 20 ऑक्‍टोबरला सकाळच्या वेळेत 16,500 मेगावॉट इतकी होती; तर महावितरणने 17,300 मेगावॉट इतकी वीज दिली होती.

सायंकाळच्या वेळेत विजेच्या मागणीतील वाढ सरासरी 800 मेगावॉट इतकी नोंदवण्यात आली. महावितरणला शेतीपंपासाठी पुरवण्यात येणाऱ्या जादा विजेसाठी अर्थ विभागाकडून आर्थिक तरतूद होणे अपेक्षित आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून शेतीला जादा तास वीज पुरवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

राज्यात सध्या 39 लाख वीजपंप आहेत; त्यांना आठ तासांऐवजी 10 तास वीज पुरवण्यात येत आहे. शेतीसाठी एक हजार मेगावॉट अतिरिक्त वीज पुरवावी लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT