महाराष्ट्र

अधिकाऱ्यांना छळल्यास पाच वर्षांची कैद

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण, धमकावणे, शारीरिक दुखापत करणे यांसारख्या गुन्ह्याला आता दोन वर्षांऐवजी पाच वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या मुळावर उठलेल्या वाळूमाफियांना यापुढे चाप बसणार आहे. सरकारने याबाबतची अधिसूचना काढली आहे. या दुरुतीमुळे मारहाण आणि दमबाजी हे दखलपात्र गुन्हे ठरणार आहेत.

राज्यात अधिकारी-कर्मचारी यांना मारहाण करणे, त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. रॉकेल माफिया, वाळूमाफिया यांच्या हल्ल्यात अनेक अधिकारी मरण पावले आहेत. सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्यावरील हल्ल्यात गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी राजपत्रित अधिकारी-कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे वारंवार केली जात होती. या मागणीला यश आले आहे. सरकारने या मागणीची दखल घेतली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे. धाकदपटशा करणे. यासाठी कलम 353 अन्वये आधी दोन वर्षांच्या कैदेची तरतूद होती. त्यात दुरस्ती करून ती पाच वर्षे इतकी केली आहे. याबाबतची अधिसूचना सरकारने काढली आहे. याबाबतचे विधेयक विधिमंडळात सरकारने मांडले होते. ते मंजूर करून राष्ट्रपती यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविले होते. राष्ट्रपती यांच्या मंजुरीनंतर अधिसूचना सरकारने अधिसूचना काढली आहे. या दुरुस्तीमुळे मारहाण आणि दमबाजी हे दखलपात्र गुन्हे ठरणार आहेत. मात्र सहा महिन्यांत हे खटले निकाली काढता येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT