महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे म्हणतात, 'मुख्यमंत्रिपदापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे'

वृत्तसंस्था

अहमदनगर : मुख्यमंत्रिपदावर कोण असेल, या प्रश्नापेक्षा मला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे वाटते. त्यासाठी माझे प्राधान्य आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांच्या मनातील चीड उफाळून आल्यास सत्तेची आसने खाक होतील, असेही ते म्हणाले. 

श्रीरामपूर येथे पीक विमा केंद्राच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पीक विमा केंद्र सुरू करायला हवे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देण्याची भूमिका नेहमीच राहिलेली आहे.

अन्नदाता राहिला पाहिजे सुखी

अन्नदाता सुखी राहिला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. त्याचा बळी देण्याचे पाप आपण कधीही करणार नाही. तुम्ही सर्व लोक शिवसेनेची ताकद आहात.

कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला?

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी व पीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला, असा प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांना केला होता. त्यावर बोटावर मोजण्याइतक्याच लोकांनी हातवर केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhavwadi Theft case : धक्कादायक! वैभववाडीत बंद बंगला फोडला, चक्क चोरट्यांनी दोन गॅस सिलिंडर चोरले

MI vs KKR सामन्यावर पावसाचं सावट? काय आहेत हवामान अंदाज अन् कसा राहिलाय दोन्ही संघाचा रेकॉर्ड?

Mobile Storage Tricks : सतत मोबाईलचं स्टोरेज फुल्ल होतंय? फ्रीमध्ये मिळेल जास्त स्पेस, एकदा वापरुन तर बघा 'ही' १ सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Horoscope : उद्या ३० मार्च! नवा आठवडा 'या' ३ राशीच्या लोकांसाठी धनलाभ योग आणणार; अडकलेले मोठे काम मार्गी लागणार, विदेश दौरा संभवतो

SCROLL FOR NEXT