महाराष्ट्र

प्लॅस्टिकची बाटली बाळगल्यास दंड! 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्य सरकारने लागू केलेल्या प्लॅस्टिक बंदीअंतर्गत प्लॅस्टिकच्या बाटल्या बाळगणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला. दरम्यान, प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयावर स्थगिती आणण्याच्या मागणीसाठी प्लॅस्टिक उत्पादकांच्या संघटनेच्या याचिकेवर न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार आहे. 

प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने प्लॅस्टिक उत्पादकांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांवरही कारवाई होणार का, त्यांनाही मुदत देण्यात आली आहे का, असा प्रश्‍न न्यायालयाने सरकारला विचारला. प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे सर्वांवर कारवाई आवश्‍यक आहे, असे उत्तर सरकारच्या वतीने देण्यात आली. 

प्लॅस्टिक बंदी लागू करण्यापूर्वी सरकारने कोणतेही निकष किंवा नियम लागू केलेले नाहीत. त्यामुळे सरसकट बंदी बेकायदा आहे, असा दावा याचिकादारांच्या वतीने करण्यात आला. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीकडे दाद मागण्याची तयारीही याचिकादारांनी दर्शवली आहे. तोपर्यंत कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT