महाराष्ट्र बातम्या

PM Narendra Modi : ''महाराष्ट्राला जगाचं आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य'', मुंबईत पंतप्रधानांनी सांगितलं राज्याचं भविष्य

संतोष कानडे

मुंबईः राज्यातल्या 30 हजार कोटींच्या विकासाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झालं. मुंबईतल्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी मोदींची महाराष्ट्राची समृद्धी आणि भविष्यात पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांबद्दल माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे. रस्त्यांचं आणि रेल्वेचं जाळं उभं राहात असतानाच कौशल्य विकासाच्या योजना पूर्णत्वाला जाणार आहेत. मागच्या महिन्याभरापसून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे.. एनडीए सरकारच स्थिरता आणि स्थाईत्व देणारं सरकार आहे. तिसऱ्यांदा आमच्या सरकारने शपथ घेतल्यानंतर एनडीए सरकार तीनपट गतीने काम करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, सशक्त वर्तमान आहे आणि समृद्ध भविष्याचं स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. इंडस्ट्री, अॅग्रिकल्चर, फायनान्स या सगळ्या पॉवर महाराष्ट्राकडे आहेत. महाराष्ट्राला जगातलं सगळ्या मोठं आर्थिक पॉवर बनवण्याचं माझं स्वप्न आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक असलेले किल्ले आहेत, कोकणातलं टूरिझम आहे, समुद्राच्या तळाचं मनमोहक दृष्ट आहे, सह्याद्रीच्या डोंगरावर फिरण्याची वेगळी अनुभूती आहे.. त्यामुळे महराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे.

मोदी म्हणाले की, मुंबईमध्ये १० वर्षांपूर्वी आठ किलोमीटर मेट्रो रेल्वे झाली होती. आज मुंबई मेट्रो ८० किलोमीटरपर्यंत गेली आहे. पुढेही २०० किलोमीटरपर्यंतचं काम प्रगतीपथावर आहे. मागच्या दहा वर्षात महाराष्ट्रात नॅशनल हायवेची लांबी वाढून तीनपट झाली आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रोजेक्ट हा प्रगती आणि प्रकृतीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ठाणे ते बोरीवली रस्त्याचं कामही सुरु आहे.

''सध्या पंढरपूर वारीमध्ये लाखो वारकरी चालत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग २०० किलोमीटर पूर्ण झाला आहे, संत तुकाराम पालखी मार्ग ११० किलोमिटपर्यंत पूर्ण होत आहेत. हे दोन्ही मार्ग लवकरच खुले होतील. सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि पंढरीच्या विठुरायाला कोटी-कोटी नमन करतो.''

मोदी पुढे म्हणाले की, कनेक्टिव्ही इन्फ्रास्ट्रक्चरमुळे शेती, उद्योग आणि पर्यटनाला लाभ होतोय. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. जेव्हा चांगली कनेक्टिव्हिटी असते तेव्हा महिलांना सुरक्षा आणि सन्मान मिळत असतो. एनडीए सरकारचं काम गरीब, शेतकरी आणि नारी शक्ती आणि युवा शक्तीला सशक्त करतं. महाराष्ट्राचं सरकार याच कटिबद्धतेने काम करत आहे आणि काम करत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT