महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादीला आता प्रकाश आंबेडकरांचा मोठा दणका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आऊटगोईंगमुळे धक्क्यांवर धक्के बसत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज आपली भूमिका जाहीर करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस फक्त चर्चेचा प्रस्ताव देते चर्चा मात्र करत नाही. त्यामुळे चर्चा करायची की नाही हे त्यांनी आधी ठरवावं असा इशारा आंबेडकरांनी दिला.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. त्यावरही आंबेडकरांनी काँग्रेसकडून खुलासा मागवलाय. जोपर्यंत काँग्रेस  खुलासा देत पुरावे देत नाही तोपर्यंत चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर काँग्रेसने वचिंत आघाडीसोबत पुन्हा चर्चेचा प्रस्ताव दिलाय. लोकसभेत 8 ते 10 जागांवर वंचितमुळे फटका बसल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. मात्र वंचितने ज्या अटी घातल्या होत्या त्या काँग्रेसला मान्य करणं शक्यच नव्हतं. लोकसभेसाठी तब्बल 22 जागा देण्याची मागणी वंचितने केली होती. आघाडी फिस्कटल्याने त्याचा फायदा भाजपला झाला.

आता विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने केलेल्या राजकीय आरोपांवर प्रकाश आंबेडकरांनी उत्तर मागीतलंय. तर आंबेडकरांनी या आधीच 40 जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. या दोनही अटी काँग्रेस मान्य करण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही आघाडी होण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीत असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT