ramdas athawale 
महाराष्ट्र बातम्या

Election Results : ...म्हणून आम्ही ही निवडणूक जिंकली: आठवले

सकाळवृत्तसेवा

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014 ची निवडणूक जिंकली. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या कामावर 2019 ची निवडणूक आम्ही जिंकली आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

आठवले म्हणाले, 'नरेंद्र मोदींची हवा नाही म्हणणाऱ्या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला आहे. जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती तर तुफान होते. लोकसभा निवडणुकीच्या आजच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होत आहे. काँग्रेस आणि विरोधकांच्या अपप्रचाराला देशभरातील दलित बहुजन जनतेने भीक घातली नाही. मोदींच्या आणि एनडीएला देशभरातील आंबेडकरी जनतेने आणि दलित बहुजनांनी भरीव मतदान देऊन खंबीर साथ दिली आहे.'

'राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसला साथ देणे योग्य नव्हते. शिवाय, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनावश्यक टीका करायला नको होती. शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेससोबत राहण्यापेक्षा एनडीएमध्ये यायला हवे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्याने एनडीएसोबत राहिले पाहिजे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी एनडीएचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले आहेत,' असेही आठवले म्हणाले.

दरम्यान, आठवले यांनी वांद्रे येथील संविधान बंगल्यावर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांसह फटाके फोडून आणि लाडू वाटप करून आनंद साजरा केला. शिवाय, राज्यातील आंबेडकरी जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Latest Marathi News Updates : निवडणूक आयोगात भाजप कार्यकर्ते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

SCROLL FOR NEXT