Prasad Lad Esakal
महाराष्ट्र बातम्या

प्रसाद लाड यांना दिलासा! सोमय्या, दरेकरांपाठोपाठ आर्थिक गुन्हे शाखेकडून आणखी एक तपास बंद

प्रसाद लाड यांच्याविरुद्ध खटला पुढे नेण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाही

सकाळ डिजिटल टीम

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या एका कंत्राटात फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि इतर आरोपींविरोधात 2014 मध्ये फसवणुकीच्या गुन्ह्याचा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास आता बंद करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतरचे तिसरे भाजप नेते आहेत. यामुळे भाजप पक्षासाठी सरकारी यंत्रणा काम करत आहे का असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येत आहे.

प्रसाद लाड यांच्यावर 2009 मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात त्यांच्यावर 2014 मध्ये मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात प्रसाद लाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता.

ईओडब्ल्युने आपल्या सी समरी रिपोर्टमध्ये नमूद केले आहे, प्रसाद लाड यांच्याविरुद्ध खटला पुढे नेण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाही, असा दावा रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. यामुळे प्रसाद लाड यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : 'मोर्चा निघणार म्हणजे निघणार..'; अविनाश जाधवांच्या अटकेनंतर संदीप देशपांडेंचा इशारा

Kolhapur : अखेर इचलकरंजीला पंचगंगेचे शुद्ध पाणी मिळणार, ६०९ कोटी रूपये मंजूर; दोन वर्षात 'झेडएलडी’ प्रकल्प पूर्णत्वास येणार

११ वर्षांत २० टक्केच अनुदान! 'नैसर्गिक टप्पा वाढीच्या निर्णयाला बगल'; आजपासून शाळा बंद ठेवून शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT