महाराष्ट्र

लोकप्रतिनिधींचे अधिकार वाढले पाहिजेत - डॉ. पाटील

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - मुंबई महापालिकेसाठी असणाऱ्या बीपीएमसी कायदा 1888 मधील काही अटींमुळे लोकप्रतिनिधींना काम करण्यास अडथळा येतो हे खरे आहे. मात्र, लोकप्रतिनिधींचे अधिकार वाढले पाहिजेत, यावर आम्ही सकारात्मक असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेत सरकारची भूमिका मांडली. "बीपीएससी' या कायद्याला आणखी व्यापक बनविण्यासाठी आगामी 15 दिवसांमध्ये एक बैठक घेऊन सर्वांचे मत जाणून घेऊन यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सदस्य शरद रणपिसे यांनी संबंधित अशासकीय विधेयके मागे घ्यावीत, अशी विनंती या वेळी केली. विधान परिषदेमधील सर्व सदस्यांनी राज्यातील विविध पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची मनमानी वाढली असल्याचे सांगितले. ही मनमानी थांबविण्यासाठी कायद्यामध्ये बदल करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींकडे असावेत, अशी मागणी सदस्यांनी केली.

रणपिसे यांनी मुंबई महापालिका विधेयकांमध्ये सुधारणासंदर्भात दोन तास चर्चामध्ये प्रस्तावर सादर केले होते. यावर डॉ. रणजित पाटील यांनी सरकारची भूमिका मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT