Rutuja Latake esakal
महाराष्ट्र बातम्या

Andheri East Bypoll Result 2022: ''भाजपला सहानुभूती नव्हतीच'' विजयानंतर ऋतुजा लटके भावूक

संतोष कानडे

मुंबईः अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. साधारण ५३ हजार मतांनी त्यांचा विजय झाल्याचं सांगण्यात येतंय. काही वेळात त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होईल. त्यापूर्वी ऋतुजा लटकेंनी माध्यमांशीव संवाद साधला. यावेळी त्या भावूक झाल्या होत्या.

यावेळी बोलतांना ऋतुजा लटके म्हणाल्या की, हा विजय म्हणजे जनसेवेची पोचपावती आहे. स्व. रमेश लटके यांनी अंधेरीच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार, असं सांगतांना त्या भावूक झाल्या.

पुढे बोलतांना लटके म्हणाल्या की, भाजपला सहानुभूती नव्हती. ती असती तर त्यांनी सुरुवातीलाच उमेदवार दिला नसता. त्यांना सर्व्हेमध्ये सगळं कळलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला.

हेही वाचाः भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?

'नोटा'वर बोलतांना त्या म्हणाल्या की, 'नोटा'वर मतं देण्यासाठी प्रचार करण्यात आला. त्याच्या व्हीडिओ क्लिपदेखील समोर आलेल्या आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने मला साथ दिल्याने हा विजय सोपा झाल्याचं त्यांनी सांगितंल. शिवाय आपण आज 'मातोश्री'वर आशीर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याचं लटकेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT