File photo
File photo 
महाराष्ट्र

संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान शेतकरी विधवेला

सकाळवृत्तसेवा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ : यवतमाळ येथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान कळंब तालुक्‍यातील राजूर येथील शेतकऱ्याची विधवा वैशाली येडे यांना देण्यात आला आहे. याची घोषणा संमेलनाचे आयोजक रमाकांत कोलते यांनी गुरुवारी (ता.11) यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत केली. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या विधवेला उद्‌घाटनाची संधी संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाली आहे.
यवतमाळ हा भाग दुष्काळग्रस्त भाग आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशाच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करावे, असा प्रस्ताव आयोजकांनी महामंडळापुढे ठेवला. हा प्रस्ताव महामंडळाने बैठकीत एकमताने मंजूर केला, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर यांनी दिली. यवतमाळ येथील एका हॉटेलवर महामंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीची माहिती पत्रकार परिषदेद्वारे महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष तसेच तेलंगणा मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष विद्या देवधर यांनी दिली.
महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला तो आम्ही महामंडळाने स्वीकारला आहे, विदर्भ साहित्य संघाकडून तिसऱ्या सदस्याचे नाव सुचवले जात नाही तोपर्यंत घटनेच्या नियमाप्रमाणे अध्यक्षाचा पदभार उपाध्यक्षांनी सांभाळायचा असतो, त्याप्रमाणे मी सूत्रे हाती घेतली, असे विद्या देवधर यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ लेखिका डॉ. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेण्याबाबत आयोजक तसेच महामंडळानेही दिलगिरी व्यक्त केली. महामंडळाच्या प्रत्येक सदस्याने या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देवधर यांनी दिली. संमेलनाच्या व्यासपीठावर श्रीपाद जोशी उपस्थित राहणार नाही. संमेलनाला उपस्थित राहायचे आणि स्वतःची भूमिका मांडायची हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल याबाबत महामंडळाचा कोणताही संबंध नाही, अशी स्पष्ट भूमिका देवधर यांनी मांडली.

काही अप्रिय घटना घडल्या. त्यामुळे अनेक साहित्यिकांनी, तसेच काही रसिकांनीही संमेलनावर बहिष्कार टाकला. या सर्वांना महामंडळाच्या वतीने आवाहन आहे की, त्यांनी कटू आठवणी मागे टाकत हे संमेलन यशस्वी करणे हे एक मराठी म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे त्यामुळे सर्वांनी संमेलनाला यावे.
- विद्या देवधर, प्रभारी अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT