महाराष्ट्र बातम्या

wari 2019 : चुकलेल्या वारकऱ्यांना सुखरूप सोडले दिंडीत    

सकाळ वृत्तसेवा

वाल्हे - आषाढी वारीत चालताना दिंडीतून चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीत नेऊन सोडण्याच्या ‘जाऊ देवाचिया गावा’ उपक्रमाला सासवडमधील तळावर प्रारंभ झाला. सासवड आणि जेजुरी तळावर सुमारे २३५ वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीत सोडण्याचे काम स्वयंसेवकांनी केले.

‘सकाळ’चे ज्येष्ठ पत्रकार, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार बाबूराव चोपदार यांच्या संकल्पनेतून, सकाळ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून ‘जाऊ देवाचिया गावा’ उपक्रम सुरू आहे. चोपदार फाउंडेशननेही काही वर्षे त्यात सहभाग घेतला. बाबूराव चोपदार यांनी दिंड्यांच्या प्रत्येक मुक्कामाच्या

गावातील पत्त्यांचे संकलन केले. यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यासाठी राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सासवड पालखीतळावर वाघीरे महाविद्यालयाचे एनसीसीचे वीस विद्यार्थी तसेच सकाळ सोशल फाउंडेशनचे स्वयंसेवक प्रवीण ठुबे, अर्जुन लांडे यांनी चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या दिंडीत सोडले. त्यांना प्रा. दीपक जांभळे व श्रीकृष्ण नेवसे यांनी मार्गदर्शन केले. जेजुरी तळावर जिजामाता हायस्कूल अँड जुनियर कॉलेजचे आरएसपीचे वीस विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले. त्यांना सोमनाथ उबाळे, राघू हारूळे आणि तानाजी झगडे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

Prakash Ambedkar: शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का?: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

Bachchu Kadu: भाजपकडून माझ्या बदनामीचा अजेंडा : बच्चू कडू; कर्जमाफीपर्यंत सरकारला सोडणार नाही, नेमकं काय म्हणाले?

Pune Koregaon Park Accident Update : पुण्यातील कोरेगाव पार्क अपघात प्रकरणातील तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नेमकी घटना काय होती? संपूर्ण माहिती समोर

SCROLL FOR NEXT