Sanjay Raut  sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यसभेसाठी उगाच पैसे वाया घालवू नका; संजय राऊतांचा भाजपला सल्ला

त्यांना निवडणूक लढवायची असेल तर आम्हीही तेवढ्याच मजबूतीने रिंगणात उतरलो आहोत असं ते म्हणाले

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचे संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यसभा निवडणुकांच्या उमेदवारीवरून आणि माघार घेण्यावरून भाजप आणि मविआ सरकारमध्ये मागच्या तीन ते चार दिवसांत बऱ्याच घडामोडी घडल्या. भाजपाने निवडणुकांत माघार घेतली नसल्याने आरोप प्रत्यारोप चालू आहेत.

दरम्यान "राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळणारी व्यक्ती ही प्रगल्भ असली पाहिजे. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाने निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. पण जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर आम्हीही तेवढ्याच मजबुतीने रिंगणात उतरलो आहोत पण प्रश्न सहाव्या जागेचा आहे." असं राऊत म्हणाले.

"सहाव्या जागेसाठी भाजप अन्य पक्षांवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे मत नाहीत म्हणून त्यांच्याकडून आता आमदारांवर दबाव आणला जाणार आहे, त्यांना पैसा दिला जाणार, जुन्या प्रकरणात ईडी आणि केंद्राला घुसवणार असे काम करून आमदारांवर दबाव आणला जाणार आहे. पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी फायदा होणार नाही म्हणून उगाच भाजपने पैसे वाया घालवू नये, त्यापेक्षा सामाजिक कार्यात पैसे खर्च करावेत, लोकांना अशी चटक लावू नये." असा टोला त्यांनी भाजपला लावला आहे.

"आम्हाला अशा निवडणुकांचा सर्वाधिक अनुभव आहे, कोण कोणासोबत आहे हे दहा तारखेला कळेलंच, फक्त भाजपने उगाच पैसे खर्च करू नका." असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT