sanjay raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut News : 'सनी देओल यांच्या बंगला २४ तासांत वाचवला, पण नितीन देसाई...'; राऊतांचा गंभीर आरोप

रोहित कणसे

अभिनेता आणि खासदार सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव जाहिरात प्रसिद्ध होताच अवघ्या २४ तासांत रद्द करण्यात आला. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सनी देओलचं घर वाचवण्यासाठी दिल्लीहून संदेश आला. पण कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कुठलीही मदत केली गेली नाही त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं असा आरोप राऊतांनी केला आहे.

नितीन देसाई यांच्या आत्महत्येविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपचे खासदार अभिनेता सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव बँक ऑफ बडोदा करणार होती. तब्बल ६० कोटींचं कर्ज ते फेडू शकले नाहीत. बँकेने लिलाव पुकारला आणि लोकांना बोलवलं. आमचं सनी देओल यांच्याशी काही वयक्तिक वाद नाही. पण २४ तासांत तुम्ही तो लिलाव थांबवला. दिल्लीहून संदेश आला. तुम्ही त्यांचं घर आणि त्यांना वाचवलं. पण आपले नितीन देसाई यांचा स्टूडिओ वाचवण्यासाठी वणवण भटकत होते. त्यांनाही कर्ज फेडयचं होतं. दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटले पण त्यांना काही दिलासा मिळाला नाही. नितीन देसाई यांचा स्टूडिओ आणि जीव देखील वाचवण्यात नाही आला.

चार-पाच हजार कोटींचे बँक घोटाळे समोर येत आहेत, त्याच्यावर कारवाई होत नाही. भाजपशी संबंध असलेल्या लोकांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. मात्र नितीन देसाई यांच्या बद्दल असा निर्णय घेण्यात आला नाही. त्यांना मरू दिलं गेलं, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलं, असा गंभीर आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी केला.

चंद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाला सर्वप्रथम जेथे स्पर्श केला, त्या जागेचे नामकरण पंतप्रधान मोदी यांनी यांनी शिवशक्ती पॉइंट असे केले आहे. याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले क भारतीय जनता पक्ष अजून काय करू शकतो.

हे भारताच्या वैज्ञानिकांचं यश आहे. चांद्रयानने जेथे तिरंगा फडकवला आहे, त्या जागेला विक्रम साराभाईंचं नाव दिलं पाहिजे होतं. तसेच विक्रम साराभाई यांना भारतरत्न दिलं गेलं पाहिजे. हे सर्व पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई या दोन महान लोकांनी केलेल्या कामामुळे चांद्रयान चंद्रावर गेलं. हे पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई यांचं योगदान आहे.

पण तुम्ही शास्त्रज्ञांना विसरून जाता आणि प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व घेऊन येता. आम्ही देखील हिंदुत्वाचे पाईक आहोत, पण काही गोष्टी विज्ञानाशी संबंधीत असतात. हे वीर सावरकरांचं म्हणणं आहे. विज्ञानावर कुठल्याही धर्माचं आक्रमण ठिक नाही असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

IPL 2026: Umpire चा दुजाभाव? मुंबई अन् दिल्लीला वेगवेगळा नियम? हार्दिकच्या ग्लव्ह्ज बदलीमुळे होतायेत आरोप

पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT