Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

आजपर्यंत फक्त विरोधक सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर अनैतिक असल्याचा आरोप करत होते

सकाळ डिजिटल टीम

आजपर्यंत फक्त विरोधक सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप करत होते, पण यावेळी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या सरकारवर हल्लाबोल केला आहे. पक्ष तोड-फोड करून हे सरकार सत्तेत आलं आहे, त्याचबरोबर हे सरकार अनैतिक आहे. इतर पक्षांना तोडून हे सरकार बनवलं आहे असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. पंढरपूर कॉरिडोअरविरोधात त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. फडणवीस यांनी हा कॉरिडोअर कोणत्याही परिस्थितीत उभा राहिलं अशी ठाम भूमिका मांडली होती. त्या विरोधात सुब्रमण्यम स्वामी यांनी आपली भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत पंढरपूरचा विकास करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारच्या कृतीवर आणि शिंदे फडणवीस सरकार संदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘हे सरकार पक्ष इतर तोडून आणि आमदार फोडून हे सरकार बनवलं आहे. चालू सरकार फोडून नवीन सरकार बनवण्याची काहीच गरज नव्हती. विरोधात बसून आघाडीची पोलखोल करायची होती. त्यामुळं हे सरकार अनैतिक आहे असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

विरोधक दरवेळी शिंदे फडणवीस सरकारवर टीका करते. परंतु यावेली सत्तेतील भाजपच्या माजी खासदाराने या सरकारला अनैतिक संबोधल्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT