शिरपूर जैनः रविवारी अंतरिक्ष पार्श्वनाथच्या मंदिराचा वाद पुन्हा एकदा पेटला होता. श्वेतांबर समाजाने पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता काढलेल्या रॅलीने निकलंक निकेतन भवन समोर मोठा राडा झाला होता. त्यामध्ये अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात शिरपूर पोलिसांनी अठरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सोमवारी तणावपूर्ण शांतता दिसून आली भाविकांना पोलीस बंदोबस्तामध्ये दर्शन घ्यावे लागले. जैन समाजाचे 23वे तीर्थंनकर अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराच्या वादाने सोमवारी उग्र रूप धारण केले होते.
हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
11 मार्च रोजी मंदिर उघडल्यानंतर मूर्तीच्या लेप करण्याच्या प्रक्रियेसाठी दिगंबर व श्वेतांबर पंथीयांमध्ये एकमत होत नसल्याने मोठे वादंग निर्माण होत आहे. रविवारी दिनांक 19 मार्च रोजी श्वेतांबर समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता गावामधून रॅलीचे आयोजन केले होते.
सदर रॅली मंदिरापासून निघाल्यानंतर परत येताना पोलिसांनी नेमून दिलेला मार्ग बदलून सदर रॅली दिगंबर समाजाचे निकलंक निकेतन भवन समोर आली त्यावेळी जमावाने चिथावणीखोर घोषणाबाजी, शिवीगाळ, धक्काबुक्की, दगडफेक, चप्पल फेक, खुर्च्या फेक जे हातात मिळेल ते एकमेकांच्या अंगावर फेकण्यात आले. असा प्रकार बेकाबू जमावाणे केला. दोन्ही पंथ एकमेकांसमोर आमने-सामने झाले. त्यामुळे प्रचंड राडा होऊन अनेक व्यक्ती जखमी झाले .यामध्ये येथील दिगंबर समाजाचे सुरेंद्र कदम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार करण्यात येत आहे. तर इतर व्यक्तींना जबर मारहाण झाली आहे.
रविवारी घडलेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात केला आहे. डीवायएसपी पुजारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. मंदिर परिसरामध्ये व आतमध्ये पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात करून भाविकांना दर्शनासाठी मुख्य दरवाजाच्या बाहेर लाईनमध्ये उभे करण्यात आले व भाविकांना आतमध्ये गर्दी न होऊ देता, दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. इतर कुठल्याही व्यक्तींना आत मध्ये प्रवेश देण्यात येत नाही.
सदर घटनेमुळे भाविकांची गर्दी मात्र मंदावली असून शिरपूर गावामध्ये व भाविकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांनी गावामध्ये प्रचंड प्रमाणात हाणामारी करून, धुडगूस घातला होता. त्यामुळे स्थानिक लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सदर घटनेमुळे भाविकांची संख्या सुद्धा रोडावल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान 19 मार्च रोजी घडलेल्या हाणामारीच्या प्रकरणांमध्ये एकूण 18 व्यक्तींवर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्याद दिली व पोलिसांच्या फिर्यादीवरून 1) अक्षय मुथा 2) डॉ. संतोष संचेती 3) संजय कोठारी 4) अशोक भंसाळी व इतर मोर्चातील 5) तात्यासाहेब, तेजनकर 6) संजय विश्वभर, शिरपुर 7) आशिष डहाळे, मालेगांव 8) विशाल गोरे शिरपुर 9) देवेंद्र महाजन शिरपुर 10) संजय आंबेकर रिसोड 11) गुंगे रिसोड 12)संजय कानेड शिरपुर 13) आकाश महाजन शिरपुर 14) ऋशिकेष संजय आंबेकर, रिसोड 15) लक्की रोकडे, मालेगांव 16) विक्की रोकडे, मालेगांव 17) स्वप्निल काळे 18) डॉ.महाविर गुंगे, रिसोड या अठरा व ईतर व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच दिनांक 18 मार्च रोजी झालेल्या हाणामारीमध्ये निवेश भरतभाई दोशी त्यांच्या फिर्यादीवरून पाच अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत. तपासामध्ये अजून किती लोकांवर गुन्हे दाखल होतात हे पोलिसांच्या तपासांती कळणार आहे. तूर्तास मात्र शिरपूर गावामध्ये तणाव पूर्ण शांतता असून भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडवल्याचे चित्र दिसून आले. एकूणच आता पोलीस प्रशासन अलर्ट मोड मध्ये आल्याने सर्व सूत्र पोलीस प्रशासनाने आपल्या हाती घेतले आहेत. शिरपूर गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना नेटाने प्रयत्न करावे लागणार आहेत हे मात्र निश्चित.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.