महाराष्ट्र

सरकारला गुडघे टेकायला लावू - शेट्टी

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केले. 

खासदार शेट्टी म्हणाले, ""अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रा 16 सप्टेंबरपासून सुरू होईल. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिल्लीतील जंतरमंतरवर दहा लाख शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम सरकारकडून झाले नाही. आयात-निर्यातीची चुकीची धोरणे, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, पूर्वी 28 हजार कोटी रुपयांच्या शेतमालाची आयात होत होती, आज एक लाख कोटीवर गेली आहे. पूर्वी 42 हजार डॉलरपर्यंतचे चलन निर्यातीतून मिळत होते. आज ते 32 हजार डॉलरवर आले आहे, हे काय आहे? या अशा धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरसकट सात-बारा कोरा व्हायला हवा आणि उत्पादन खर्चाच्या 50 टक्के जादा नफा द्यावा.'' 

""कर्जमाफीमध्ये दहा लाख शेतकरी बोगस आहेत, असे स्वतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले असता मुळात सरकारला किती माहिती आहे, हा प्रश्‍न आहे. 34 हजार कोटींची कर्जमाफी म्हणतात, पण सगळ्या नियम, अटी, निकषाचा विचार करता अवघी 5-7 हजार कोटींची कर्जमाफी होईल, त्यातही राज्यातील शेतकऱ्यांकडे पीककर्ज किती, मध्यमकर्ज, दीर्घमुदत कर्जे किती, याची साधी आकडेवारी सरकारकडे नाही,'' असे खासदार शेट्टी यांनी सांगितले. 

कर्जमाफीचे अर्ज भरण्यास द्या मुदतवाढ 
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत अर्ज भरून होणे अशक्‍य आहे. त्यामुळे सरकारने याची मुदत वाढवून देण्याची मागणी खासदार शेट्टी यांनी दिली. 

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना आश्‍वासने दिली. आता त्या प्रश्‍नांची सोडवणूक होत नाही, एकतर शेतीतले त्यांना कळत नाही आणि कळत असेल, तर ते दिशाभूल करून फसवत आहेत. 
- राजू शेट्टी, खासदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT