zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

तत्कालीन शिक्षणमंत्र्यांना पुन्हा दणका! पुस्तकातील वह्यांच्या पानानंतर आता कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द; दुसऱ्या टप्प्यात ‘इतक्या’ शिक्षकांची भरती

राज्यातील दहा किंवा त्यापेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषदांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय आज (सोमवारी) शालेय शिक्षण विभागाने रद्द केला आहे. यापूर्वी पुस्तकात वह्यांची पाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेला दुसरा निर्णय रद्द केला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील दहा किंवा त्यापेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषदांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय आज (सोमवारी) शालेय शिक्षण विभागाने रद्द केला आहे. यापूर्वी पुस्तकात वह्यांची पाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेला दुसरा निर्णय रद्द केला आहे.

तत्कालीन शिक्षणमंत्री केसरकर यांनी २३ सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय काढून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी डीएड किंवा बीएड पदवीधारक बेरोजगार तरुणांना कंत्राटी तत्त्वावर नेमण्याचा निर्णय घेतला होता. नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा तात्पुरता निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी त्या शाळांचा घटलेला पट हे देखील मूळ कारण होते. २०२२ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा २० जानेवारी २०२५ रोजी सुरु झाला आहे. त्यामुळे पूर्वीचा शासन निर्णय आता रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण विभागाचा नवा निर्णय...

ज्या उमदेवारांना पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे उमेदवारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे, त्यांना आता मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणे किंवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यावर (जे अगोदर होईल त्यानुसार कार्यवाही) पूर्वीच्या कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती रद्द ठरेल, असे नव्या शासन निर्णयात म्हटले आहे.

दुसऱ्या टप्प्यात १५ हजार शिक्षक भरती

तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी राज्यात ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करण्याचे जाहीर केले होते. पण, त्यातील १९ हजार शिक्षकांचीच भरती झाली होती. त्यामुळे रिक्त पदे असलेल्या शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळाले नव्हते. त्यावर ‘सकाळ’ने वृत्त देखील प्रकाशित केले होते. त्यानंतर सध्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित खासगी शाळांमधील १४ ते १५ हजार शिक्षक भरले जाणार आहेत.

शिक्षक भरतीची स्थिती

  • पहिल्या टप्प्यातील भरती

  • ३०,०००

  • पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध

  • २१,६००

  • शिक्षक भरती झाली

  • १९,०००

  • दुसऱ्या टप्प्यातील भरती

  • १५,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

Crime: आधी अमानुष मारहाण; नंतर पँटमध्ये विंचू सोडला अन्..., सरकारी शाळेतील शिक्षकांचं ८ वर्षीय मुलासोबत धक्कादायक कृत्य

ICC कडून विश्वविजेत्या भारतीय संघाला भरघोस बक्षीस, पण BCCI ने रोहितसेनेपेक्षा हरमनप्रीतच्या संघाला दिली निम्मीच रक्कम!

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

Thane News: राजकीय कमानींचा वाहतुकीला अडथळा! ट्रेलर कमानीत अडकल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी; अडसर कधी दूर होणार?

SCROLL FOR NEXT