Navneet Rana and uddhav Thackeray Navneet Rana and uddhav Thackeray
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घाबरले म्हणून...- नवनीत राणा

राणा दाम्पत्याने मोदींच्या दौऱ्याचं कारण देत हनुमान चालिसा पठणाचा निर्णय मागे घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा चंगच बांधला होता. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी रात्रभर त्यांच्या घराबाहेर पहारा दिला आणि त्यांच्याविषयीची संताप व्यक्त केला. त्यानंतर आत्ताच काही वेळापूर्वी आपण आपला निर्णय मागे घेत असल्याचं राणा दाम्पत्याने सांगितलं.

या निर्णय़ानंतर माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, आज बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही. आजची शिवसेना म्हणजे गुंडसेना आहे. या सगळ्या गुंडांना उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आणि आपल्या सगळ्या गुंडांना आणि शिवसैनिकांना आमच्यावर हल्ला करण्यासाठी तयार राहायला सांगितलं. माझा उद्धव ठाकरेंना एक प्रश्न आहे, त्यांनी शिवसैनिकांना हल्ल्यासाठी तयार राहायला सांगितलं, उद्धव ठाकरे जर घाबरले नाहीत तर त्यांनी का पोलिसांचा आधार घेतला? आमच्यासोबत येणारे कार्यकर्ते हनुमानाचे भक्त होते, रामभक्त होते. ज्यावेळी आम्हाला पोलिसांनी नोटिस दिली, तेव्हा आम्ही जर एवढा समजूतदारपणा दाखवून येणाऱ्या सगळ्या लोकांना तिथेच थांबवलं. एवढ्या शांततेने आम्ही पावलं उचलली. पण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गुंड पाठवून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला..अरे आम्ही राज्याच्या भल्यासाठी हनुमान चालिसा पठण करत आहोत.

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, "मुख्यमंत्री राज्यभरात गेले नाहीत, शेतकऱ्यांना भेटले नाहीत, एसटी कर्मचाऱ्यांशी बोलले नाहीत, राज्यातल्या परिस्थितीविषयी एक शब्द बोलले नाहीत. मग हनुमान चालिसालाच एवढा विरोध का? ज्या नावाने, ज्या विचारधारेने तुम्ही, तुमचे पुत्र मंत्री झाले, त्या विचारधारेला तुम्ही सोडलेलं आहे. रामाला, हनुमानाला मानणारे जे लोक आहेत ते येत्या काही दिवसांत गोव्यामध्ये जी तुमची परिस्थिती झाली, नोटापेक्षा कमी मत देऊन तुमचा तिरस्कार केला, तशीच परिस्थिती महाराष्ट्रातही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना दाखवून देतील. "

"जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोलिसांच्या आड लपले नसते तर पूर्ण महाराष्ट्रात आम्हाला अडवण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती आणि घाबरणारे जर कोणी असतील तर ते उद्धव ठाकरे आहेत. जर घाबरलो असतो तर अमरावतीवरून मुंबईपर्यंत आम्ही पोहोचलो नसतो.", असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ धोत्रे खून प्रकरणात पोलिसांना शरण आलेल्या उद्धव निमसेंना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT