महाराष्ट्र

अर्थसंकल्पावरील चर्चेला विधानसभेत बगल

सकाळन्यूजनेटवर्क

शिवसेना आमदारांचा तीव्र विरोध
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अर्थसंकल्प सादर करताना विरोधकांचा गोंधळ व त्यातून 19 विरोधी आमदारांचे निलंबन यामुळे आक्रमक सरकारने बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चा व लेखानुदान चर्चेविनाच मंजूर केले. यामुळे शिवसेना आमदार कमालीचे संतापल्याची घटना विधानसभेत घडली. मात्र हे केवळ लेखानुदान व तातडीच्या खर्चाचे विधेयक असल्याने अर्थसंकल्पातील बाबनिहाय चर्चा होणार असून, त्या वेळी सर्वच आमदारांना अर्थसंकल्पावर मते मांडता येतील, असे संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.

अर्थसंकल्पावरील चर्चेला भाजप आमदार राजेंद्र पटनी यांनी सुरवात केली. कालपासून (ता. 22) सुरू असलेली चर्चा पुढे सुरू करताच पाटणी यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थांबवले व लेखानुदान मंजूर करण्याची विनंती केली. शिवसेना आमदार विजय औटी यांनी विरोध केला. चर्चेविना विनियोजन मंजूर करताच कसे, असा सवाल करत ही लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप त्यांनी केला.

मात्र, मंत्री मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीका करत अर्थसंकल्प राज्यातील जनतेच्या हिताचा असून, सदस्यांच्या मागण्यांचा विचार पुढील अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये निश्‍चितपणे केला जाईल, असे सांगितले. त्यानंतर 2017-18 चा लेखाअनुदान प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT