High-Court-Mumbai
High-Court-Mumbai 
महाराष्ट्र

मतदान केंद्रांवर स्वच्छतागृहाची सुविधा हवी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रथमोपचार व स्वच्छतागृहांची सोय करण्याची मागणी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केली. तसे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली .

निवडणुकीच्या कामांसाठी सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षकांची नियुक्ती केली जाते. हे काम जिकिरीचे असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी १४ ते १६ तास राबावे लागते. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांत तर मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांवर अधिक ताण असतो. त्यापैकी बहुतेक सरकारी कर्मचारी आणि अधिकारी मध्यमवयीन असतात. त्यामुळे त्यांना आधीपासूनच कुठल्या ना कुठल्या आरोग्याच्या समस्या असतात. कामाचा अतिताण पडल्यामुळे असे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो, असे वकील दीपक चट्टोपाध्याय यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे. मागील मतदानाच्या वेळी राज्यात पाच-सहा ठिकाणी अतिताणामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्याच्या घटना घडल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT