weather update maharashtra monsoon konkan Rainfall increased in the dam area pune Sakal
महाराष्ट्र बातम्या

कोकण, घाटमाथ्यावर जोर कायम; धरण क्षेत्रात पाऊस वाढला

मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. दमदार पावसाने कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. दमदार पावसाने कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर घाटमाथ्यावरील पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, नागपूुरात दोन दिवसांच्या ब्रेकनंतर वरुणराजाने पुन्हा शहरात दणक्यात एंट्री केली. गुरुवारी दुपारी उपराजधानीत सर्वत्र विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला. जोरदार पावसामुळे जागोजागी झाडे पडली. ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाली.

शहरात दीड ते दोन तासांत तब्बल ८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट असल्यामुळे पुढील तीन-चार दिवस आणखी जोरदार पावसाची शक्यता आहे.

इगतपुरीमध्ये चांगला पाऊस

नाशिक : मॉन्सूनने इगतपुरीसह त्र्यंबकेश्‍वर अन् पेठ या आदिवासी तालुक्यांत गेल्या २४ तासात चांगली हजेरी लावली. इगतपुरीमध्ये ५०.६, पेठमध्ये ४५.४, तर त्र्यंबकेश्‍वरमध्ये ५३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील धरण साठ्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सिंधुदुर्गात जोर पुन्हा वाढला

वैभववाडी ः एक दिवस उघडीप दिल्यानंतर गुरुवारी पहाटेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे.

हतनूर धरणाचे ३० दरवाजे उघडले!

जळगाव : दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्‍याने नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हतनूर धरणातून तापी नदी पात्रात ४२ हजार ३७८ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. तापी नदीच्या मध्य प्रदेशातील उगम स्थानाच्या परिसरातील पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

तळियेत घरे उभारणीस सुरुवात

मुंबई : महाड तालुक्यातील तळिये गावातील दरडग्रस्त कुटुंबीयांसाठी घरे उभारण्यास अखेर सुरुवात झाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ६३ घरांचे काम सुरू झाले आहे. येत्या दिवाळीपर्यंत या कुटुंबीयांना घरांचा ताबा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी २२ व २३ जुलै रोजी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तळिये आणि आजूबाजूच्या वाड्यांमधील अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT