Actor subodh bhave and ravi jadhav Team esakal
मनोरंजन

'असा' चित्रपट पुन्हा न होणे, उजाळा 'बालगंधर्व' चित्रपटाच्या आठवणींना....

प्रख्यात दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या बालगंधर्व चित्रपटाच्या आठवणींना सोशल मीडियावर उजाळा दिला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील जे सर्वोत्तम चित्रपट आहेत त्यात दिग्दर्शक रवी जाधव (Ravi jadhav) यांच्या बालगंधर्व (Balgandharva) चित्रपटाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता या चित्रपटाला मिळाली. त्यावेळच्या राष्ट्रपती पुरस्कारावरही या चित्रपटानं मोहोर उमटविली. अभिनय, संगीत, गायन, छायादिग्दर्शन, कथा आणि दिग्दर्शन यासर्वच पातळ्यांवर या चित्रपटानं आपलं वेगळेपण सिध्द केलं होत. प्रख्यात गायक बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित असणा-या या चित्रपटानं मराठी माणसाच्या मनात आदराचं स्थान पटाकावलं. त्या चित्रपटाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

प्रख्यात दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी आपल्या बालगंधर्व चित्रपटाच्या आठवणींना सोशल मीडियावर उजाळा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर करुन त्याविषयी रसिकांचे लक्ष त्या पोस्टकडे वेधले आहे. हा चित्रपट तयार करताना आपल्याला कोणच्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला हे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्या चित्रपटाचा एका वाड्यात उभारलेला सेट, कलाकारांच्या वेगवेगळ्या गंमती जमती जाधव यांनी यावेळी शेअर केल्या आहेत. रवी जाधव यांच्या या पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे.

रवी जाधव य़ांनी आपल्या बालगंधर्व चित्रपटाबद्दल जी पोस्ट शेअर केली आहे त्यात ते लिहितात, आज दहा वर्ष झाली ‘बालगंधर्व’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन. भोरच्या वाड्यामध्ये ३३ दिवस अखंड अहोरात्र काम करण्यासाठी साक्षात बालगंधर्वच आम्हा सर्व टिमला बळ देत होते असे अजूनही वाटते. ही कलाकृती साकारत असतानाचा प्रत्येक कडू गोड क्षण अजूनही आठवतो. सेट वरच्या गमती जमती, सेट ते हॅाटेल प्रवास, रात्री हॅाटेल मधील गाण्यांच्या महफीली, सेट वरचे टेन्शन… सर्वच.

memories of balgandharva movie
memories of balgandharva movie
memories of balgandharva movie
memories of balgandharva movie

या चित्रपटाने खूप काही दिले. नवे मित्र दिले, नवा दृष्टीकोण दिला, नवे बळ दिले. नवा आत्मविश्वास दिला. केवळ ही दहा वर्षच नाही तर पुढील अनेक दशके मराठी रंगभूमीवरचे हे काही सोनेरी क्षण ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा अनूभवता येतील हे नक्की. असा अद्भूत विषय व तो साकारायला झटणारी अशी ब्रीलीयंट टिम पुन्हा पुन्हा मिळत नाही. या सर्व टीमला मनापासून नमन आणि प्रेम. अशा शब्दांत रवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला महिलांना ३,००० रुपये मिळणार? फक्त एकच अडचण; पण कोणती? जाणून घ्या...

TET Result Date: टीईटी उमेदवारांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपर्यंत लागणार निकाल

Makar Sankranti 2026: एकाच दिवशी 4 दुर्मिळ योगायोग! सूर्यदेव कोणत्या वाहनावर होणार स्वार?

Nashik Municipal Election : दिवे कुटुंबाची 'सहावी' इनिंग; काँग्रेसचा हात सोडून हाती घेतले 'धनुष्यबाण' आणि 'कमळ'!

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' समारंभाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT