जायकवाडी : हिरडपुरी येथील बंधारा पूर्णपणे भरत आला आहे.
जायकवाडी : हिरडपुरी येथील बंधारा पूर्णपणे भरत आला आहे. 
मराठवाडा

गाेदावरी नदीवरील 11 बंधारे भरले

गजानन आवारे

जायकवाडी (जि.औरंगाबाद ) : जायकवाडी नाथसागर भरल्याने नाथसागरातून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीवरील एकूण 19 बंधाऱ्यांपैकी 11 बंधारे जवळपास भरत आले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
जायकवाडी नाथसागर भरल्यामुळे नाथसागराच्या दरवाजांतून पाणी सोडण्यात आले.

त्यामुळे गोदावरी नदीवरील आपेगाव, हिरडपुरी, जोगलादेवी, मंगरूळ, राजाटाकळी, लोणीसावंगी, ढालेगाव, मुदगल, मुळी, डिग्रस, शहागड हे बंधारे भरले आहेत; तसेच अमदुरा व बळेगाव हे दोन बंधारे पावसाच्या पाण्याने भरलेले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे जवळपास 350 किलोमीटरपर्यंतचे नदीपात्र जलमय झालेले आहे. यामुळे या परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.


गोदावरीस आलेल्या पुराचे पाणी औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बंधाऱ्यांमध्ये साठविण्यात येत आहे. टंचाई असो की पुराचे पाणी साठवणे गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांची उपयुक्तता सिद्ध होत आहे. विकेंद्रीत स्वरूपात व नदीच्या लांबीमध्ये पाणीसाठा होत असल्यामुळे टंचाई निर्मूलनासाठी व उपजीविकेसाठी आवश्‍यक असलेल्या सिंचनासाठी बंधारे खूप मोलाची भर घालत आहेत.
- राजेंद्र काळे, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग


आपेगाव व हिरडपुरी येथील बंधारा जवळपास पूर्ण भरत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
- बळीराम औटे, कालवा सल्लागार समिती सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT