Manoj Jarange Esakal
मराठवाडा

Manoj Jarange: कुणामुळे अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली? मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप

Manoj Jarange: देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अनेकांना भाजपमधून बाहेर पडण्याची वेळ आली, तर त्यांना त्यांच्यापुढे कोण गेलेलं चालत नाही, असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव घेऊन पहिल्यांदाच थेटच आरोप केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय, असे जरांगे म्हणाले आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अनेकांना भाजपमधून बाहेर पडण्याची वेळ आली, तर त्यांना त्यांच्यापुढे कोण गेलेलं चालत नाही, असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तर यावेळी त्यांनी अजित पवार यांनी फडणवीसांमुळे शरद पवारांना सोडवं लागलं असाही आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, कधीच अजित पवार राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत, पण, जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं असं म्हणत ते तिकडे गेले, छगन भुजबळ देखील शरद पवारांना कधी सोडू शकत नाहीत, त्यांचं आणि अजित पवारांचं जमत नाही पण, देवेंद्र फडणवीस जेलमध्ये टाकतील म्हणून अजित पवारांसोबत पटत नसून छगन भुजबळांना भाजपसोबत जावं लागलं असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे देखील कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत, पण नाईलाजाने त्यांना माघारी जावं लागलं, तर अशोक चव्हाणांच्या घरी ३ वेळा मुख्यमंत्री पद दिलं ते देखील कधीच काँग्रेस सोडू शकत नाहीत मात्र, त्यांना काँग्रेस सोडून भाजपमध्ये जावं लागलं असंही जरांगे म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, ज्यांना जेलमध्ये पाठवलं पण, ते त्यांच्या पक्षात गेल्यावर कसं काय चांगले झाले असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले

मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळावरून निघून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत. सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, मुंबईच्या दिशेने निघाले असताना अशक्तपणामुळे जरांगे पाटील यांना भोवळ आली, त्यामुळे येथे प्रचंड गोंधळ झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारने आतापर्यंत किती रुपये खर्च केले? या पैशातून करता आली असती 'ही' मोठी कामे

LPG Alternative : LPG च्या टेन्शनपासून होणार सुटका ! आता एका क्लिकवर मिळणार PNG कनेक्शन, गॅसचा खर्चही होणार कमी, काय आहे सरकारची योजना?

Kolhapur Rape Case : ओळखपत्र करून देण्याचा बहाणा, तरुणीवर सामूहिक वारंवार अत्याचार; फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी, पोलिसांनी मोबाईल घेतला अन्

Latest Marathi News Live Update : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, अनेक सखल भागांत पाणी साचले

Shirol Tehsildar protest : शिरोळ तहसीलदारांसह पाच अधिकाऱ्यांना कोंडले, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी आंदोलक संतप्त

SCROLL FOR NEXT