court
court 
मराठवाडा

नोटीस न देताच जिल्हा परिषदेने रोखला शिक्षकाचा पगार

सुषेन जाधव

बीड जिल्ह्यातील शिक्षकाची खंडपीठात धाव

औरंगाबाद : बीड जिह्यातील शिक्षकाचा पगार मे २०१६ पासून रोखून धरण्यात आलेला आहे. नोटीस न बजावताच बीड जिल्हा परिषदेने पगार थांबविला आहे. हा प्रकार ग्राहय धरता येणार नाही, असे मत मांडत याचिकाकर्ता २०१० पासून शिक्षक सेवक पदावर कार्यरत असल्यास त्याचे वेतन सुरु करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.

श्रीमंत कारभारी मुंडे यांनी सदर याचिका दाखल केली होती. त्यानुसार संस्थेने मुंडे यांना १६ एप्रिल २०१० रोजी नियुक्तीपत्र दिले होते. तर २२ आॅगस्ट २०१४ रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर कायम मान्यताही देण्यात आली. परंतू दोन मे २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे १०० टक्के समायोजन झाल्याशिवाय खासगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षकांची भरती करता येत नाही. या निर्णयाआधारे शिक्षण आयुक्तांनी याचिकाकर्त्याला नोटीस बजावली. पण हा निर्णय लागू होण्याअगोदर नियुक्ती देण्यात आल्याने याचिकाकर्ता नाहक भरडल्या जात असल्याची बाजू मांडण्यात आली. सुनावणीअंती प्रकरणात चार आठवड्यात निर्णय घेण्याचे व याचिकाकर्ता २०१० पासून शिक्षक सेवक पदावर कार्यरत असल्यास त्याचे वेतन सुरु करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. अ‍ॅड. संभाजी मुंडे यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT