farmer
farmer  
मराठवाडा

पिके गेली हे मान्य; पण पंचनाम्यासाठी निकषांवर बोट 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद  : यंदा वेळेवर व भरपूर पाऊस पडणार, असा हवामान विभागाने अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी वेळीच मशागत केली होती. जूनच्या प्रारंभीच पावसाने जोरदार हजेरी लावताच जोमाने पेरण्या केल्या. मात्र, पावसाअभावी हलक्‍या जमिनीवरील पिके वाया गेली असल्याचे प्रशासन मान्य करते. परंतु या नुकसानीचे प्रत्यक्षात पंचानामे करणार का, यावर मात्र निकषांवर बोट ठेवले जात आहे. 

मराठवाड्यातील शेतकरी मागील चार वर्षांपासून कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करीत परिस्थितीला तोंड देत आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणासोबतच त्याला प्रशासनाच्या अन्यायकारक भूमिकेलादेखील तोंड देण्याची वेळ आली आहे. यंदा सुरवातीपासून मोठ्या उत्साहाने बळिराजा कामाला लागला. मात्र, पावसाने दगा दिल्याने हलक्‍या जमिनीवरील बहुतांश पिके गेल्याने, तसेच काही तग धरून असलेल्या पिकांना चांगला उतार येणार नसल्याने पुन्हा एकदा डोक्‍याला हात लावण्याची वेळ आली आहे.

जून, जुलैमध्ये पेरण्यांनंतर अनेक ठिकाणी अंकुर जमिनीच्या वर आले. मात्र, पावसाने दगा दिल्याने त्याने माना टाकल्या. यामुळे बऱ्याच ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. असे करूनही मधल्या काळात पावसाने पुन्हा तब्बल 54 दिवस दडी मारली. या काळात हलक्‍या जमिनीवरील सोयाबीन, मूग, उडीद करपले. विशेष म्हणजे हे सर्व विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर मान्य करतात. मात्र, या पिकांचे पंचनामे करणार का, असे विचारले असता, पिकांच्या नुकसानीबाबत केंद्राने काही निकष ठरवले आहेत. यामध्ये जर आपण बसत असलो तरच पंचनामे होतील, असे थातूरमातूर उत्तर देऊन ते मोकळे झाले आहेत. 

चार तालुक्‍यांत अद्यापही सरासरीपेक्षा कमी पाऊस 
तब्बल दोन महिने दडी मारलेल्या पावसाने मागील महिनाभरापासून अधूनमधून मात्र जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जवळपास 50 टक्‍के मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. असे असतानाही मराठवाड्यातील चार तालुक्‍यांत अद्यापही अपेक्षित सरासरी ओलांडलेली नाही. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील माहूर, हिमायतनगर आणि देगलूर तालुक्‍यांचा तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या एका तालुक्‍याचा समावेश आहे. पंधरा दिवसांपूर्वी सात तालुक्‍यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होता. मात्र, आठवडाभरात झालेल्या पावसाने तीन तालुके यातून कमी झाले आहेत. 

मराठवाड्यात 559 मिलिमीटर पाऊस 
मराठवाड्यात बुधवारपर्यंत (ता. 20) सरासरीच्या तुलनेत केवळ 85.15 टक्‍केच पाऊस पडला आहे. यंदाच्या मोसमात 779 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र, आतापर्यंत 656.51 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. त्या तुलनेत केवळ 559 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT