तातेराव दामोधर पठाडे
तातेराव दामोधर पठाडे 
मराठवाडा

मराठवाड्यात मुलीच्या लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याने संपविले जीवन

शेखलाल शेख

औरंगाबादः मागील वर्षापासून पासून पीक कर्जासाठी बॅंकेच्या चकरा मारल्यानंतर या वर्षी वीस हजारांचे पीक कर्ज मंजुर झाले. वीस हजारांची रक्कम सकाळी खात्यात जमा झाली. मात्र, तुटपुंज्या रकमेत काय होणार, सर्व कर्ज कसे फेडणार, दुबार पेरणीचे संकट, सतत नापिकी, यंदा मुलींचे लग्न कसे करणार या चिंतेने खचलेल्या आडगाव सरक (ता. औरंगाबाद) येथील शेतकरी तातेराव दामोधर पठाडे (वय 52) यांनी गुरुवारी (ता.14) रात्री स्वतःच्या शेतातील निलगिरीच्या झाडास गळफास बांधून आपली जीवन यात्रा संपविली. शुक्रवारी त्यांचे शासकीय घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले.

तातेराव दामोधर पठाडे (वय 52) यांची आडगाव मधील पुर्व भागात 26 गुंठे जमीन आहे. आपल्या याच जमीनीत ते घर बांधून वास्तव्यास होते. त्यांना चार मुली तर 1 मुलगा आहे. मोठ्या कष्टाने, कर्ज काढून त्यांनी तीन मुलींचे लग्न केले. आता एक मुलगी बारावी वर्गात असून ती सुद्धा लग्नाला आलेली आहे. दोन ठिकाणचे स्थळ सुद्धा तीला आले होते. मात्र तातेराव पठाडे यांच्याकडे पैसेच नसल्याने त्यांची चिंता वाढली होती. 26 गुंठे जमीनीतून उत्पन्न मिळत नव्हते. कुटुंबासाठी यातून थोडेफार धान्य ते पिकवत. येथे कुटुंबाचे पालन पोषण करतांना त्यांची चांगलीच दमछाक झाली होती.
मागील वर्षी त्यांनी पीक कर्ज मिळावे यासाठी बॅंकेत खुप खेट्या मारल्या होत्या. मात्र जमीन कमी असल्याने त्यांनी पीक कर्ज मिळाले नाहीत. या वर्षी त्यांनी सर्व कागदपत्रे जमा करुन पळशी शहर येथील स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखेत पीक कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश सुद्धा आले.

गावकऱ्यांनी सांगितले की, गुरुवारीच त्यांच्या खात्यावर वीस हजारांचे पीक कर्ज जमा झाले होते. ही रक्कम खात्यातच असतांना त्यांनी रात्री आपले जीवन संपविले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने मुलीचे लग्न कसे करणार याची चिंता त्यांना सतावत होती. मागील वर्षीच त्यांनी पाहुणे, ओळखीचे व्यक्तीचे यांच्याकडून काही रक्कम हातउसनी घेऊन तिसऱ्या मुलीचे लग्न केले होते. याच चिंतेने मागील काही दिवसांपासून ते खुपच तणावात होते. गुरुवारी रात्री त्यांनी आपल्या शेतातील निळगिरीच्या झाडाला गळपास लावुन जीवन यात्रा संपविली. शुक्रवारी त्यांच्या कुटुंबियांना सकाळी त्यांचा मृतदेह झाडाला लटकेला आढलला. करमाड पोलिसांनी पंचनाम करुन शासकीय रुग्णालय घाटीत शवविच्छेदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT