auto accident 
छत्रपती संभाजीनगर

काय म्हणावं अशा दैवाला ! विराजच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान, दवाखान्यात नेताना अपघातात मृत्यू

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: मुलाच्या उपचारासाठी अकोल्याहून आलेल्या दांपत्याची रिक्षा उलटल्याने तीन वर्षीय चिमुकला ठार झाला. तर अन्य तिघे जखमी झाले. हा भीषण अपघात विजयनगर चौकात मंगळवारी (ता.नऊ) सायंकाळी सहा वाजता घडला. विराज श्रीकृष्ण बांगर (वय तीन) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

या अपघातात श्रीकृष्ण गजानन बांगर, शिल्पा श्रीकृष्ण बांगर आणि नर्मदा मनोहर रणसिंघे हे जखमी झाले. श्रीकृष्ण आणि शिल्पा बांगर यांचा मुलगा विराज याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले होते. त्याच्या अधिक उपचारासाठी बांगर दांपत्य मंगळवारी अकोला येथून औरंगाबादेत आले. ते सिडको बसस्थानकावर उतरून रिक्षाने शहानूरमियाँ दर्गा भागात राहणाऱ्या नातेवाइकांकडे निघाले.

त्याच रिक्षात नर्मदा रणसिंघे यादेखील बसलेल्या होत्या. त्यांची रिक्षा सिडको बसस्थानक येथून कामगार चौक, जयभवानीनगर चौक, पुंडलिकनगर रोडमार्गे विजयनगर, सूतगिरणी चौकातून शहानूरमियाँ दर्गा चौकाकडे जाणार होती.

परंतु, विजयनगर चौकात त्यांच्या रिक्षाला रस्ता ओलांडणारा एक मुलगा आडवा पळाला. चालकाने त्याला वाचविण्यासाठी अचानक ब्रेक दाबले. जसे ब्रेक दाबले तशी रिक्षा उलटली. या भीषण अपघातात रिक्षाखाली दबून विराज गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या अपघाताची नोंद पुंडलिकनगर ठाण्यात करण्यात आली आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT