marriage accident 
छत्रपती संभाजीनगर

मित्राच्या लग्नाची चालली होती वरात, गाणं होतं झिंगाट; पण कठड्याने केला घात

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: मित्राच्या लग्नाला जाणे पंचवीस वर्षीय तरूणाच्या जीवावर बेतले. मिरवणुकीत नाचताना अंदाज न आल्याने कठडा नसलेल्या विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. कच्चीघाटी (ता. औरंगाबाद) येथे रविवारी (ता.२१)रात्री ८ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहेत.

सचिन गोरखनाथ आरणे (२५, रा. कोपरगाव, जि.नगर, ह.मु. चिकलठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो चिकलठाणा येथे मेडिकल चालवायचा. त्याची बहीण चिकलठाणा विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) नोकरीला आहे. त्याचा मित्र अर्जून राजपूत याचे रविवारी कच्चीघाटी येथे लग्न होते.

रात्रीचे लग्न असल्याने अन्य मित्रांसोबत सचिन तेथे गेला होता. मंदिराजवळच विहीर आहे. या विहिरीला कठडे नसल्याने आणि अंधार असल्याचा अंदाज आला नाही. इकडे नवरदेवाची सवाद्य मिरवणूक सुरू असतानाच सचिनचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला. हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सचिनला वाचविण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु, अचानक विहिरीत पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तसेच, तो पाण्यात बुडाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

विहिरीत पडून सचिनचा मृत्यू झाल्याचा प्रकार नातेवाईकांना समजला तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला. परंतु, पोलिसांनी त्यांना घटनास्थळ दाखविले. त्यानंतर या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : 'मोर्चा निघणार म्हणजे निघणार..'; अविनाश जाधवांच्या अटकेनंतर संदीप देशपांडेंचा इशारा

Kolhapur : अखेर इचलकरंजीला पंचगंगेचे शुद्ध पाणी मिळणार, ६०९ कोटी रूपये मंजूर; दोन वर्षात 'झेडएलडी’ प्रकल्प पूर्णत्वास येणार

११ वर्षांत २० टक्केच अनुदान! 'नैसर्गिक टप्पा वाढीच्या निर्णयाला बगल'; आजपासून शाळा बंद ठेवून शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT