bjp Aurangabad
bjp Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

'मंत्री संजय राठोडांना अटक झालीच पाहिजे', औरंगाबादमध्ये भाजप महिला मोर्चा आक्रमक

प्रकाश बनकर

औरंगाबाद:  मागील काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं नाव येत आहे. मंत्री राठोड यांना अटक करून सखोल चौकशी करावी या मागणीसाठी आज भाजप महिला मोर्चातर्फे अमरप्रीत चौकात आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांना क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिस आणि महिला पदाधिकाऱ्यांमध्ये काही वेळ झटापट झाली. 'राजीनामा द्या, राजीनामा द्या' संजय राठोड राजीनामा द्या, तिघाडी सरकारचे करायचे काय ,भाजप सरकार जिंदाबाद, तिघाडी सरकार हाय हाय' अशा विविध घोषणा महिला पदाधिकार्‍यांनी दिल्या. पोलिसांतर्फे या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती.

पोलिसांतर्फे आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलन करू नये अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र आंदोलन करण्यावर पदाधिकारी कायम असल्यामुळे घोषणाबाजी सुरू होताच पोलिसांनी महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता काळे, मनिषा भन्साळी, लता दलाल यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांना  ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान काही महिलांनी रस्त्यावर येत वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.

आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत. ही प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करत आहे. संजय राठोडांवर कारवाई व्हावी, निष्पक्षपणे तपास व्हावा अशी आमची मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळायला पाहिजे. या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घेत त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज महिला मोर्चा तर्फे रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात आले- संजय केणेकर, शहराध्यक्ष भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT