Aurangabad Chikalthana Airport Expansion
Aurangabad Chikalthana Airport Expansion sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : विस्तारीकरणात करावा २५ वर्षांचा विचार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये औद्योगिक वसाहत वेगाने विकसित होत आहे. त्यादृष्टीने पुढील २५ वर्षांचा विचार करून चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा विचार करावा, अशा सूचना दिल्लीत झालेल्या बैठकीत सहभागी तज्ज्ञांनी केल्या. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील शिष्टमंडळाने विमानतळ विस्तारीकरणासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची नवी दिल्ली येथील राजीव गांधी भवनात भेट घेतली.

‘सीएमआयए’चे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, उपाध्यक्ष नितीन गुप्ता, उत्सव माछर, दुष्यंत आठवले, अभिषेक मोदानी, औरंगाबाद फर्स्टचे माजी अध्यक्ष प्रीतीश चटर्जी, उपाध्यक्ष मुकुंद कुलकणी आणि विवेक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विमानतळ विस्तारीकरणाबाबत मुकुंद कुलकर्णी यांनी प्रेझेन्टेशन केले.

बैठकीत प्रामुख्याने पाच मुद्यांवर चर्चा झाली. पहिला मुद्दा म्हणजे, औरंगाबादमध्ये औद्योगिक वसाहत वेगाने विकसित होत आहे. त्यादृष्टीने पुढील २५ वर्षांचा विचार करून विस्तारीकरणाचा विचार करावा. त्याचबरोबर कोरोनापूर्वी औरंगाबादमधून १७ विमाने उड्डाण घेत होती. आता ही संख्या अत्यल्प आहे. ही संख्या पुन्हा पूर्वपदावर आणून नव्या विमानसेवेसाठी प्रयत्न केले जावे. औरंगाबादमध्ये नाइट पार्किंगची सुविधा निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरात येण्यासाठी आणि सकाळी लवकर शहराबाहेर जाण्याची सोय होईल. कारण, आजघडीला औरंगाबादची विमानसेवा सायंकाळी चारनंतर आहे.

त्याचबरोबर औरंगाबाद येथे इमिग्रेशन सुविधा सुरू करण्यात यावी, जेणेकरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला प्रोत्साहन मिळेल. यासंदर्भात गृहमंत्रालयाशी संवाद साधावा. याशिवाय एअर कार्गो सेवेचा सर्वोत्तम उपयोग करून घेण्याबाबत चर्चा झाली. इमिग्रेशनचे सहसचिव (गृहमंत्रालय) सुमंत सिंग, औषध नियंत्रक प्रमुख व्ही.जी. सोमाणी, विमानतळ प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार भारद्वाज, कार्यकारी संचालक (ऑपरेशन) विवेकानंद चौरे, फ्लाय बिगचे व्यवस्थापकीय संचालक संजय मांडविया, संजय केणेकर, भगवान घडमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इमिग्रेशनला तत्त्वतः मान्यता

यावर उत्तर देताना मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, की औरंगाबाद येथील विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर इमिग्रेशन सुविधा सुरू करता येऊ शकेल. यासाठी गृहमंत्रालय विभागाशी चर्चा करू. फ्लाय बिग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय मांडविया यांच्याशी औरंगाबाद ते हैदराबाद या विमानसेवेशिवाय इतर शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्याशिवाय भारतातील उडान शहरांशी औरंगाबादला विमान सेवेशी जोडण्यासाठी औरंगाबादच्या संस्था व संघटनांनी पुढाकार घ्यावा. ज्यामुळे विमानसेवा बळकट होईल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून निष्पन्न झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT