Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : ऐन दिवाळीत सडलेल्या पिकांचा स्टॉल

सरसकट नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सर्वत्र पाणीच पाणी असल्याने खरीप पिकांसह फळ, भाजीपाला सडला. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी पळशी शहर येथे दिवाळीच्या दिवशीच सडलेल्या पिकांचा स्टॉल लावला. कोंब आलेला मका, बाजरी, सडलेले कांदे, टोमॅटो, सोयाबीन, कापूस याला कुणी खरेदीदार मिळणार आहे का ? असा सवाल करत पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे हाताशी आलेला मका, बाजरीला कोंब फुटले आहेत. सोयबीनसह टोमॅटोची नासाडी झाली. वेचणीला आलेला कापूस भिजला. आता शेतात पंचनामे करण्यासाठी पिकेसुद्धा शिल्लक राहिली नाहीत. त्यामुळे सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शंकरराव ठोंबरे, नानासाहेब पळसकर, दत्तु पळकर, सुभाष लहाने आदी शेतकऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT