Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : ऐन दिवाळीत सडलेल्या पिकांचा स्टॉल

सरसकट नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सर्वत्र पाणीच पाणी असल्याने खरीप पिकांसह फळ, भाजीपाला सडला. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी पळशी शहर येथे दिवाळीच्या दिवशीच सडलेल्या पिकांचा स्टॉल लावला. कोंब आलेला मका, बाजरी, सडलेले कांदे, टोमॅटो, सोयाबीन, कापूस याला कुणी खरेदीदार मिळणार आहे का ? असा सवाल करत पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे हाताशी आलेला मका, बाजरीला कोंब फुटले आहेत. सोयबीनसह टोमॅटोची नासाडी झाली. वेचणीला आलेला कापूस भिजला. आता शेतात पंचनामे करण्यासाठी पिकेसुद्धा शिल्लक राहिली नाहीत. त्यामुळे सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शंकरराव ठोंबरे, नानासाहेब पळसकर, दत्तु पळकर, सुभाष लहाने आदी शेतकऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT