छत्रपती संभाजीनगर

शिवसेनेचा बालेकिल्ला शिवभोजन थाळीपासून वंचित, पोटाची खळगी भरणे कठीण

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळुज परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र याच बालेकिल्ल्यातच जनता शिवभोजन थाळीपासून वंचित आहे. त्यामुळे बजाजनगर येथे शिवभोजन थाळी सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने उद्योजक अर्जुन आदमाने यांनी केली आहे. वाळूज परिसरातील लोकसंख्या ही जवळजवळ पाच लाख आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे येथे मोठ्या प्रमाणात कामगार राहतो. विशेष म्हणजे येथील बहुतांश मतदार हे शिवसेनेला पसंती देतात. त्यामुळेच या परिसरात शिवसेनेचे सत्ता आहे. त्यामुळे हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथील मतदानावर शिवसेनेची नेतेमंडळी आपली मर्दुमकी गाजवतात. मात्र याच नेत्यांना येथील जनतेचा विसर पडल्याचे दिसून येते.

राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर अनेक ठिकाणी शिवसेनेच्या वतीने शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. त्याचा लाभ तेथील जनतेला मिळत आहे. कोरोना काळात अनेकांची रोजीरोटी बुडाली, लहान-मोठे व्यावसायिक हातावर आले आहे. अनेकांना पोटाची खळगी भरणे कठीण झाले आहे. अशावेळी वाळूज परिसरातील कामगारांना शिवभोजन थाळी अत्यावश्‍यक झाली आहे. शिवसेनेच्या वरिष्ट नेते मंडळीसह स्थानिक पदाधिकारी यांच्या उदाशिन भुमिकेमुळे खुद्द शिवसेनेच्याच बालेकिल्ल्यातील जनता शिवभोजन थाळीपासून वंचित राहत आहे. त्यामुळे येथे शिवभोजन थाळी सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते तथा उद्योजक अर्जुन आदमाने यांनी सोशल मीडियाद्वारे उद्योगमंत्र्यांकडे केली आहे.

कामगारांचे स्थलांतर टळेल : वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात प्रत्येक राज्यातील कामगार स्थायिक झालेला आहे. त्यातील बहुतांश कामगार हे अस्थायी स्वरूपात वाटेल ते काम करून उपजीविका भागवतात. मात्र अनेकांचा रोजगार लाॅकडाऊनमुळे हिरावला गेला आहे. त्यामुळे अनेक कामगार स्थलांतरित होत आहे. या परिसरात शिवभोजन थाळी सुरू केल्यास या परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर टळेल. शिवाय उद्योजकांना कामगार व कामगारांना रोजगार मिळेल.

प्रस्ताव असेल तर विचार करू : वाळूज परिसरात शिवभोजन थाळी असायला हवी. याबाबत अद्यापही प्रस्ताव आलेला नाही. जर तसा प्रस्ताव आला. तर त्यावर निश्चितच विचार करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया सेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी दिली.

कोरोनामुळे मागणी नाही : ज्या ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करायची असते, तेथे शिवभोजन केंद्र म्हणून मान्यता घ्यावी लागते. कोरोना काळामुळे तशी मागणी आली नाही. जर मागणी आली तर कलेक्टर यांच्याकडून तात्काळ वाळूज परिसरासाठी शिवभोजन थाळी केंद्र मंजूर करून घेऊ, असे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT