औरंगाबाद : सद्याच्या राजकीय परिस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या जागा कुठेच रिक्त नाहीत. ज्यांना ज्यांचे काम करायचे त्यांचे काम करावे मात्र पक्षात राहून दुहेरी भूमिकेत वावरू नये. त्यामुळे बंडखोरी करून नेते गेले असले तरी जनतेमध्ये मदत पोचवणारी यंत्रणा, शिवसैनिकांचा पाया मजबूत आहे. औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीत दिसेलच, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातून दोन हजार शपथपत्रे सादर केली आहेत. तसेच २० हजार प्राथमिक सदस्य नवीन नोंदणी केली आहे. जिल्ह्यात एक लाखावर प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य असल्याचे श्री. दानवे यांनी सांगितले. वेगवेगळ्या पक्षातून शिवसेनेत येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, मात्र शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी दिली जाईल.
महाविकास आघाडीने लढायचे किंवा नाही हे पक्ष सांगेल त्याप्रमाणे केले जाईल मात्र गट, गणात आणि वॉर्डात लढण्याची आमची तयारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आमदार सत्तार डरपोक : दानवे
पत्रकार परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात आमदार श्री. दानवे म्हणाले, आमदर अब्दुल सत्तार हे डरपोक आहेत. नुसता त्यांच्या तोंडात दम आहे ते व्यावसायीक राजकारणी. गर्दी जमवण्याचे त्यांचे एक तंत्र आहे हे सर्व ठिक आहे मात्र त्यांच्या बंडखोरीचा शिवसेनेच्या मतांवर कसलाच परिणाम होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.