e-waste centres
e-waste centres  esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : महाराष्ट्रात सर्वाधिक ई-कचरा प्रक्रिया केंद्रे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : तंत्रज्ञानाचा वापर देशात वाढत असला तरी ई-कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. दुसरीकडे त्यावर प्रक्रिया, फेरवापर करणाऱ्या अधिकृत केंद्रांची संख्या पुरेशी नाही. देशात फक्त ४७२ अधिकृत फेरवापर-विघटन करणाऱ्या केंद्रांची संख्या असून दरवर्षी १४ लाख २६ हजार ६८५.२० टन एवढीच प्रक्रिया करण्याची क्षमता या सर्व केंद्रांची आहे. यात देशात सर्वाधिक ११६ केंद्रे महाराष्ट्रात असून त्याची प्रक्रिया करण्याची क्षमता एक लाख ६ हजार २८० टन एवढी आहे.

ई-कचऱ्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा २१ प्रकारच्या उपकरणांचा समावेश होतो. २०१९-२० या वर्षाचा विचार केला तर देशभरात दहा लाख १४ हजार ९६१.२१ टन एवढा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा निघाला होता. त्या तुलनेत त्यावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण फक्त २२.७ टक्के होते. हा नोंदणीकृत ई-कचरा आहे तर दुसरीकडे नोंदणीकृत नसलेल्या भंगारात विक्री होणाऱ्या ई-कचऱ्याची समस्या वाढती आहे.

ई-कचरा (व्यवस्थापन) नियम २०१६ नुसार देशात २१ प्रकारची इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ई-कचऱ्यात मोडतात. संगणक आणि मॉनिटर, माऊस, की-बोर्ड, मोबाईल फोन, त्यांचे खराब झालेले सुटे भाग, दूरचित्रवाणीसंच व त्यांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक खेळणी, निकामी सेल, रिमोट, व्हीसीआर, सीडी प्लेयर, जुने प्रिंटर, वायर, यंत्रे अशा ई-कचऱ्याती समस्या गंभीर आहे.

वर्ष ई कचरा (लाख टनात) पुनर्वापर (टनात) टक्केवारी

२०१७-१८ ७,०८, ४४५ ६९, ४१३ ९.७९

२०१८-१९ ७, ७१,२१५ १,६४, ६६३ २१.३५

२०१९-२० १०, १४,९६१ २,२२, ४३६ २२.७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT