Aurangabad Twin sisters ssc results
Aurangabad Twin sisters ssc results sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : जुळ्या बहिणींना समान गुण

प्रशांत शेटे

चाकूर : दोन जुळ्या बहिणी लहानपणापासून विभक्त राहिल्या. दहावीची परीक्षा दोघींनी वेगवेगळ्या शाळेतून दिली. तरी दोघींनी दहावीच्या गुणात जळवून घेत म्हणजेच दोघींनाही दहावीच्या परीक्षेत समान ८७.६० टक्के गुण मिळविण्याची किमया साधली आहे.

अंकिता व निकीता या दोघी जुळ्या बहिणी आहेत. दोघी दिसण्यामध्ये सारख्या. यामुळे घरातील सर्वजण गोंधळून जायचे. यामुळे आईने लहानपणापासून दोघींना वेगवेगळे ठेवले. कुरळा (ता. कंधार) येथील भरत श्रीरामे हे चाकूर येथे खासगी नोकरी करतात. त्यांना जुळ्या मुली आहेत. यापैकी निकीता ही आई जवळ राहून येथील भाई किशनराव देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती. अंकिता ही गावाकडे आजी-आजोबा जवळ राहून कुरळा गावातील श्री शिवाजी विद्यालयात दहावीला होती.

लहानपणापासून दोघी स्वतंत्र राहत होत्या. कधीतरी त्यांच्या भेटी होत असत. दोघी एकमेकींच्या संपर्कात राहून अभ्यास करीत होत्या. दहावीचा निकाल जाहीर झाला तेव्हा दोघींना समान ४३८ गुण मिळाले आहेत. जुळ्या बहिणींनी १५ वर्षे विभक्त राहिल्यानंतर दहावीच्या परीक्षेतील गुणातही जुळवून घेतल्याबद्दल दोघींचे भाई किशनराव देशमुख शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता कोयले, सहशिक्षका वर्षा सांगवीकर यांनी अभिनंदन केले.

दोघींना समान गुण पडल्यामुळे सर्वांना आश्चर्यांचा धक्का बसला. परीक्षेच्या काळात आम्ही एकमेकीच्या संपर्कात होतो. अभ्यास स्वतंत्र केला. यापुढेही आम्ही दोघी लातूर येथे एकत्र अकरावी कला शाखेला प्रवेश घेणार आहोत.

- निकीता, अंकिता भरत श्रीरामे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT