Child personality development
Child personality development 
छत्रपती संभाजीनगर

तुमचं मूल लाजाळू आहे का?

संदीप लांडगे

औरंगाबाद : ‘‘आपल्या मुलाने ‘ॲक्टिव्ह’ असावे, खूप मित्र बनवावे, समस्येला धीटपणे सामोरे जावे, आनंदी व सुखी राहावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. पण निशांत असा नव्हता. त्याच्यासारखं लाजरं मूल संपूर्ण कॉलनीत नव्हतं. घरी पाहुणे आले की, तो पाहुणे जाईपर्यंत खोलीत लपून बसायचा. आईवडीलसोबत असतील तेव्हाच तो घराबाहेर पडत होता. बोलताना त्याची नजर सतत भिरभिरायची. कोणाशीच तो जास्त बोलत नव्हता.

त्याच्या या स्वभावामुळे नेहमी त्याला एकटे राहाण्याची वेळ येत होती. आम्हाला त्याची काळजी वाटायची. त्याला आम्ही समुपदेशकांकडे घेऊन गेलो. त्यांनी त्याला हळूहळू बोलतं केलं. त्याला व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकासाचे क्लास लावले. थोड्याच दिवसात त्याच्यामध्ये बदल दिसू लागला. आज हाच मुलगा पाहुणे आले की आदरातिथ्य करतोय. एकटाच बाहेर खेळायला, क्लासेसला जातोय. त्याच्यातील हा बदल आमच्यासाठी खूप अनपेक्षित आहे.

सध्या तो पुढील शिक्षणासाठी एकटाच हैदराबादला जाऊन राहत आहे. कधी कधी वाटते तो हाच निशांत आहे का? आता तो खूप जबाबदारीने वागतो.’’ निशांतबद्दलचा अनुभव सांगताना त्याची आई खूप खूश दिसत होत्या.

प्रत्येक मुलाचा स्वभाव हा वेगळा असतो. काही मुले बिनधास्त तर काही खूप लाजरी असतात. बिनधास्त असणाऱ्या मुलांपेक्षा लाजाळू मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा मुलांबाबत पालकांना नेहमी चिंता वाटते. आपल्या मुलांचा हा स्वभाव बदलला पाहिजे असे पालकांना सुद्धा वाटत असते. पण त्यासाठी नेमके काय करावे हे पालकांना माहीत नसते.

‘लेकुराचे हित पाहे माउलीचे चित्त...

मुलांना घडवणे, शिकवणे, त्यांच्यावर संस्कार करण्यात पालकांचा वाटा मोठा असतो. सध्या आई-वडील दोघेही नोकरीमध्ये व्यस्त असल्याने मुलांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही; पण तरीही मुलांशी सुसंवाद साधणे अत्यावश्यक आहे.

सुसंस्कार, सुसंवाद, सुनियोजन या तिन्ही गोष्टी साध्य केल्यास मुलांमध्ये बदल होऊ शकतो. संत तुकाराम महाराजांनी एक अभंगात म्हटले आहे की, ‘लेकुराचे हित पाहे माउलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीना प्रिती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे’. आईवडील मुलांचे हित नेहमीच पाहत असतात. त्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतात.

पालकांनी हे करावे...

  • मुलांसमोर इतरांना त्याच्या लाजाळूपणाबद्दल सांगू नये

  • मुलांसोबत अधिक सहानुभूतीपूर्ण व्यवहार करणे टाळा

  • स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मुलांना प्रेरित करा

  • दबाव न टाकता त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या द्या

  • सार्वजनिक कार्यक्रमात मुलांना आवर्जून घेऊन जा

होणारे नुकसान

  • शैक्षणिकदृष्ट्या मागे पडतात

  • मुलांमध्ये सोशल फोबिया तयार होतो

  • नवीन लोकांचा सामना करू शकत नाहीत

  • आत्मविश्वासामध्ये कमतरता येते

  • एकटेपणाचे शिकार होऊ शकतात

  • मनामध्ये नैराश्याचे वातावरण तयार होते

  • दैनंदिन कार्य करताना अडथळा निर्माण होतो.

मुले लाजरी होण्याची कारणे

  • व्यक्तिमत्त्व ः भावनिकदृष्ट्या अतिसंवेदन असले की मुलांमध्ये लाजरेपणा निर्माण होतो

  • आनुवंशिकता ः पालकांचा स्वभाव लाजरा असेल तर मुलेदेखील लाजरे होतात.

  • सामाजिक संवादाचा अभाव ः सुरुवातीच्या काळात मुले सामाजिकदृष्ट्या वेगळे राहिले असल्यास.

  • टीका ः पालक, भावंडं किंवा नातेवाइकांकडून टोमणे मारले जातात तेव्हा आत्मविश्वास कमी होतो.

  • अनुकरण ः कुटुंबातील एखाद्याचा स्वभाव लाजरा असेल तर मुलं अनुकरणातून लाजरेपणा शिकतात.

आईवडिलांचा स्वभाव शांत असेल तर मुलेदेखील लाजरे होऊ शकतात. कधीकधी हे आनुवंशिकदेखील असू शकते. या मुलांना दैनंदिन व्यवहारात पुढे करावे. मुलांना मित्रांसोबत बाहेर मैदानावर खेळायला सोडावे. त्यांना बोलायला भाग पाडून त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेणे. त्यांचे वर्तन बदलत नसेल तर मानसतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी.

-डॉ. संदीप शिसोदे, मानसतज्ज्ञ व समुपदेशक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT