corona impact corona impact
छत्रपती संभाजीनगर

दर घसरल्याने टोमॅटोसह फळभाज्या गुरांच्या दावणीला....!

पाचोड परिसरातील वडजी, देवगाव व कुतबखेडा ही गावे भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असून टोमॅटोचे, बटाटे व फूलकोबीचे आगार म्हणून ओळखली जातात

हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (covid 19 effect) बाजारपेठा बंद असल्याने फळभाज्याचे भाव कमालीचे गडगडले असून टोमॅटोसह उन्हाळी फळभाज्याचे उत्पादन घेणारे शेतकरी पडलेल्या दरामुळे टोमॅटो, बटाटे व कोबी गुरांना वैरण म्हणून दावणीत टाकत असल्याचे चित्र पाचोड (pachod) (ता.पैठण) परिसरात पाहवयास मिळते. विक्रीसाठी तोडणीलाही टोमॅटो, बटाटे व फुलकोबी परवडत नसल्याने बहुतांश शेतकरी (corona impact on farmer) ते तसेच शेतात ठेऊन गुरांना वैरण म्हणून वापरत आहेत.

पाचोड परिसरातील वडजी, देवगाव व कुतबखेडा ही गावे भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असून टोमॅटोचे, बटाटे व फूलकोबीचे आगार म्हणून ओळखली जातात. गेल्या वर्षभरापासून भाजीपाला व टोमॅटो आदी फळभाज्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असल्याने उत्पन्न देण्याऐवजी तोटाच देत आहे. आज ना उद्या बाजार खुले होऊन दोन पैसे मिळतील या अपेक्षेने वर्षभरापासून फळभाज्या विक्रेते नवनवीन फड लागवड करून उत्पन्न काढत आहे ,परंतु त्यांच्या नशिबी तोटाच येत असल्याने ते आता हतबल झाले आहेत.

मध्यंतरी टाळेबंदीत सूट मिळाल्यानंतर बऱ्यापैकी हातात पैसा खुळू - खूळू लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहवयास मिळत होता, मात्र हे फार काळ टिकले नाही. २५० ते ३०० रुपये प्रति कॅरेट पर्यंत मजल गाठणारे टोमॅटो तर तीस रुपये किलोचा भाव मिळविणारे बटाटे आता कमालीचे घसरले आहे. आता कोरोनामुळे टोमॅटोचे प्रति सत्तर रुपये कॅरेट तर बटाटे आठ रुपये प्रति किलो विक्री होत आहे.

टोमॅटोचे एक कॅरेट तोडण्यापासून वाहतुकीसाठी साठ रुपये खर्च येत असून केवळ पदरात आठ ते दहा रुपये शिल्लक राहत असल्याने ते आता तोडणीला परवडत नसल्याने त्याची गुरांना वैरण दिल्यास अवांतर वैरणीचा खर्च वाचतो असे, वडजी येथील टोमॅटो उत्पादक धर्मराज भांड यांनी सांगितले.

बटाटे उत्पादक बापुराव गाडेकर म्हणाले,"बटाटे लागवडीसाठी पंधरा रुपये किलो दराने बेणे आणले, त्यावेळी चाळीस रुपये किलो बटाट्यास भाव होता, ज्यावेळी आमचा बटाटा काढणीस आला तेव्हा लॉकडाउन सुरू झाले, अन् भाव प्रति किलो आठ रुपये मिळू लागला. टोमॅटो व बटाटे नाशवंत असल्याने त्यांची विक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही, मात्र काढणी व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने त्याचा गुरांना खाऊ घालण्याशिवाय पर्यायच नाही"

टोमॅटो तोडणी व बटाटे काढणी खर्च जाता पदरात काहीच पडत नसल्याने बटाटे व टोमॅटो उत्पादकांची परवड सुरू आहे. विविध ठिकाणचे बंद असलेले आठवडी बाजार याचा फळभाज्या खरेदी विक्रीवर परिणाम झाला असल्याचे शेतकरी सुधाकर सरोदे यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोला खर्च परवडणारा दर मिळत नसल्याने टोमॅटो न तोडण्यास पसंती दिली तर बटाटे बळीराम किंवा नांगर चालवून काढणी केली जात असल्याने अर्धनिम्मे बटाटे खराब निघून त्यासही दर नसल्याने पशुधनाचे ते खुराक बनत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

IPL 2027 मध्ये राहुल द्रविड CSK चा मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंगची हकालपट्टी? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स...

Mobile Price Hike : 10 हजारांचा स्मार्टफोन आता 20 हजारला? मोबाईल कंपन्यांचा 'तो' सिक्रेट खेळ, जो हळू हळू रिकामा करतोय तुमचा खिसा

Bakri Eid: बकऱ्याचा अजब 'डाएट प्लॅन'! रोज २५० ग्रॅम चिकन आणि कोल्ड्रिंक; AC त राहणाऱ्या काश्मिरी बकऱ्याची गोष्ट

8th Pay Commission: : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार 4 पट वाढणार? रेल्वे युनियनचा मोठा प्रस्ताव; कोणाचा पगार किती वाढणार?

SCROLL FOR NEXT