छत्रपती संभाजीनगर

कोरोनामुळे मृत्यूसत्र सुरूच, आज पुन्हा दोघांचा बळी, एकूण 41 रुग्णांचा मृत्यू 

मनोज साखरे


औरंगाबाद: औरंगाबादेत कोरोनाकंप सुरूच असून मृत्यूसत्रही थांबता थांबेना. रहेमानिया कॉलनी आणि आसेफिया कॉलनी येथील आणखी दोघांचा कोरोना आणि इतर आजारामुळे मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा आणि घाटी रुग्णालय प्रशासनाने गुरुवारी (ता. 21) दिली. या दोन मृत्यूने एकूण बळींचा आकडा 41 वर पोचला आहे. यात खासगी रुग्णालयात 3 आणि उर्वरित घाटी रुग्णालयात झाले आहेत. 

40 वा बळी

रहेमानिया कॉलनीतील 65 वर्षीय पुरुषाला 20 मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. दरम्यान त्यांचा सकाळी साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा चाचणी अहवाल सांयकाळी पॉझिटिव्ह आला. त्यांचा बायलॅटरल न्यूमोनियाटीस ड्युटू कोविड -19,  हायपरटेन्शन यामुळे मृत्यू झाला.

आसेफिया कॉलनीतील 48 वर्षीय पुरुषाला 19 मे रोजी घाटी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. दरम्यान त्यांचा 20 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा कोविड चाचणी अहवाल सांयकाळी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या मृत्यूचे कारण बायलॅटरल न्यूमोनियल सेप्सीस विथ सेफ्टीक शॉक विथ टाईप वन रेस्पायरेटरी फेल्युअर विथ टाईप टू डायबेटीस मेलिटस विथ हायपरटेन्शन विथ इचेमिक हार्ट डिसीज स्टेटस पोस्ट परक्यूटेनियस कोरोनरी अँजियोप्लास्टी हे कारण आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Kerala Puducherry Elections : सत्तेचा महासंग्राम! आसाम,केरळ,पुद्दुचेरीत आज मतदान; ५.३ कोटी मतदार निवडणार सरकार

सोलापुरात ‘डीजे’ला बंदीच; ‘डीजे’ला परवानगी नाहीच; पोलिस दोनदा मोजणार आवाज: ग्रामीण पोलिसांनी मंडळांना दिली ‘नो डीजे नो डॉल्बी’ची शपथ, वाचा...

आजचे राशिभविष्य - ०९ एप्रिल २०२६

उजनीतून शेतीसाठी ३० मेपर्यंत पाणी! एप्रिलअखेर सुटणार भीमा नदीत पाणी; १५ मेनंतर धरण उणे पातळीत, सोलापूर शहराला जाणवणार नाही टंचाई, वाचा...

अग्रलेख : धुपाटण्याचे धनी!

SCROLL FOR NEXT