farmers loss of livestock in natural calamities government do not give compensation
farmers loss of livestock in natural calamities government do not give compensation sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : नैसर्गिक आपत्तीचा निधी औटघटकेचा

सचिन चोबे

सिल्लोड : नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधन मयत झाल्यानंतर नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निधीची रक्कम वेळेत प्राप्त झाली नाही. परंतु आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी निधीची रक्कम जमा झाला. परंतु पुन्हा दुसऱ्याच दिवशी शासनखाती हा निधी जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम मिळत नसल्यामुळे तालुक्यात गेल्या वर्षभरात झालेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने मदतीची रक्कम मिळविण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागत होत्या. मात्र, कुणालाही मदत मिळाली नाही. लेखाशिर्षाखाली निधीच नसल्याने मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यांपासून मदतीचा हात आखडता घेण्यात आला आहे. वीज कोसळून, पुरात वाहून गेलेल्या जनावरांची संख्या ३२ आहे.

शासनाच्या निकषांनुसार या सर्वांना सुमारे चार लाख ५७ हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु मदत मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले होते. विविध घटनांमध्ये ६ बैल, ओढकाम करणारे १ जनावर, ८ मोठी दुधाळ जनावरे, २ छोटी दुधाळ जनावरे व १५ शेळ्या, मेंढ्याचा यात समावेश होता. निसर्गाने घाला घातल्यानंतर शासनाने तरी वेळेत मदत करणे अपेक्षित असताना कुणीही निधीसाठी प्रयत्न केले नाही.

या निधीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले असताना शासनाने ३१ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजेच्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये मयत झालेल्या जनावरांच्या देणीपोटी शेतकऱ्यांसाठी ४ लाख ५७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. परंतु हा निधी खर्च केला नाही म्हणून दुसऱ्याच दिवशी पुन्हा ही रक्कम शासनखाती जमा करण्यात आली.

तालुका प्रशासनास निधीचे वितरण करण्यास देखील वेळ न देण्यात आल्याने हा निधी म्हणजे औटघटकेचा ठरला. या प्रकाराबाबत प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराविरुद्ध शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला असून याप्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

बळिराजाने व्यक्त केला संताप

सिल्लोड येथील प्रशासनातल्या एका जबाबदार अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमध्ये पशुधन मयत झाल्यानंतर नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यात येणारा निधी पूर्ण वर्षभर प्राप्त झाला नाही. मात्र, रोजी प्राप्त झाला. परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी हा निधी शासनखाती जमा करण्यात आला. यामुळे एकूणच सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा हा प्रकार असल्याने बळिराजाने संताप व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT