558jaleel_d 
छत्रपती संभाजीनगर

आपले काय चुकले हे आधी पाहा, खासदार इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला

माधव इतबारे

औरंगाबाद : ‘एमआयएम' ने मतविभाजन केल्याने बिहारमधील निवडणुकीत आम्हाला फटका बसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करत आहेत. सत्तर वर्षे आम्ही तुमचा विचार केला, आता आम्ही आमचा विचार करू. कोणामुळे काय झाले याचा हिशेब मांडण्यापेक्षा तुमच्या काय चुका झाल्या त्यावर चिंतन करा, असा टोला ‘एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेसला लगावला.
येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जलील म्हणाले, बिहारमध्ये ‘एमआयएम'ने २० जागा लढवून पाच जागांवर विजय मिळविला.

मत विभाजनाचे काम आमच्या पक्षाने केल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र, काँग्रेसला ७० जागा लढवून फक्त १९ ठिकाणी यश मिळाले. या स्थितीला जबाबदार कोण, आपले कुठे चुकले याचा विचार काँग्रेसने करावा. बिहारमध्ये आमचा पक्ष पाच वर्षांपासून मेहनत घेत होता. त्यामुळे आजचे यश मिळाले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये आम्ही पोटनिवडणूक लढवली नाही. तेथे काँग्रेसला यश का मिळाले नाही? पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशात ‘एमआयएम'ने यावे, अशी येथील कार्यकर्त्यांची मागणी आहे. यासंदर्भातील निर्णय पक्षाचे प्रमुख घेतील. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवावी किंवा नाही; तसेच औरंगाबाद महापालिका निवडणुकीत कोणासोबत युती करावी याचा निर्णयही पक्षाचे नेते ओवेसी घेतील, असे जलील म्हणाले.

गडबड करण्यात भाजपचा हातखंडा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी गडबड झाल्याचे कानावर आले आहे. भाजपच्या उमेदवारांनी पराभव समोर दिसताच मतदान केंद्र सोडले होते. त्यांनी परत येत मतमोजणीवर आक्षेप घेतला व त्यांना विजयी घोषित करण्यात आले. गडबड करण्यात भाजपचा हातखंडा आहे, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT