औरंगाबाद : कोरोना काळापासून व त्यापूर्वीही रिक्षाचालकांच्या व्यवसायावर केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचे वाईट परिणाम होत आहे. असे असताना रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे लाल बावटा रिक्षाचालक युनियन संलग्न आयटकतर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. रिक्षा परवाना खुला करणे, प्रचंड व्यस्त प्रमाणातील विमा हप्ता, सुधार कायद्याच्या नावाखाली दंड, तडजोड फी यात अतिरेकी वाढ करणे, वाहतूक दंड हा वाहतूक शिस्त ऐवजी महसुलाचे साधन करून त्याची वसुली करणे, अशी अनेक जाचक धोरणे राबवली जात आहेत.
कर्जाऊ रिक्षा वाहनाचे हप्ते वसूलीसाठी फायनान्स कंपन्या कायदा धाब्यावर बसवून चालकांना शिवीगाळ, मारहाण करत आहेत. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांना निवेदन देण्यात आले. युनियनचे संघटक अॅड अभय टाकसाळ, राजु हिवराळे, बाबुलाल वाघ, महेमुद बक्क्ष, रफीक बक्क्ष, शेख रफीक, नसीर नेहरी, दिनेश कांबळे, अमोल सरोदे, अतिश वाघ, ज्ञानेश्वर म्हस्के आदी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
रिक्षा खुला परवाना आणि खुला बॅज बंद करा.
कल्याणकारी मंडळ तातडीने स्थापन करा.
जोखमीच्या व्यस्त प्रमाणातील विम्याची लूट थांबवा.
ओला उबेरची बेकायदा वाहतूक बंद करा
फायनान्स कंपन्यांच्या मनमानीला पायबंद घाला.
कोरोना काळातील भरपाईपोटी रिक्षा चालकास ५० हजार द्या.
अविनाश मगरे या रिक्षाचालकाच्या अंगावर बस घालून
मारणाऱ्या वाहन चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.