औरंगाबाद - शहरांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केली जात आहे. आता स्मार्ट सिटीतर्फे चालविल्या जाणाऱ्या शंभर शहर बस इलेक्ट्रिक बसमध्ये रुपांतरीत केल्या जाणार आहेत. त्यासाठी २८.४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ठराव मंजूर केला आहे.
शहरांचे प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार वित्त आयोगातून मिळणारा जास्तीत- जास्त निधी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वापरण्यात यावा, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविला जात आहे. त्यासोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांनी १४ ऑक्टोबर २०२१ ला पत्र काढले असून, इलेक्ट्रीक धोरण-२०२१ व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम धोरणानुसार सुधारित शहर कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या.
त्यानुसार महापालिकेने शहरात ईव्ही कन्व्हरजन संदर्भात शहर कृती आराखडा तीन फेब्रुवारी २०२२ ला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर केला. १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महापालिकेला २०२०-२१ ते २०२५-२६ पर्यंत ११९ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. महापालिकेने ८० टक्के म्हणजेच ९३.३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षात १५.६९ कोटी व प्रोत्साहनपर रक्कम ७.२ कोटी आणि प्राप्त निधीतील उर्वरित रक्कम ५.५२ कोटी या प्रमाणे २८.४१ कोटी रुपये स्मार्ट बससाठी वापरण्यास प्रशासकांनी मान्यता दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.