Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Accident | औरंगाबादेत दुचाकी घसरुन अपघात; एक जण ठार, १ गंभीर जखमी

धुलीवंदन सणाच्या दिवशी दुचाकी घसरुन...

मुनाफ शेख

आडुळ (जि.औरंगाबाद) : धुलीवंदन सणाच्या दिवशी दुचाकी घसरुन झालेल्या भीषण अपघातात एक तरुण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) दुपारी एक वाजेच्या सुमारास काद्राबाद (ता.औरंगाबाद) शिवारात घडली. विकास बाबासाहेब भावले (वय २७) व बंडु नंदु पिवळ (वय २५, दोघे रा.आडुळ बु., ता.पैठण) हे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कचनेर फाट्याकडुन काद्राबादकडे दुचाकीने (एमएच २० एफएक्स २२१८) जात होते. नेमके त्यावेळी दुचाकीस्वार चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरली. (One Man Died, One Serious Injured In Accident In Aurangabad)

यात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. जखमींना आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथे हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत विकास भावले याचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. तर बंडु पिवळ हा गंभीर जखमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT