औरंगाबाद : भांडण, वाद असतील, तर ते काढून टाका आणि आगामी ग्रामपंचायतीपासून पुढील सर्व निवडणुकांसाठी कामाला लागा, असा कानमंत्र केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (ता. १२) कार्यकर्त्यांना दिला. भाजप ग्रामीण जिल्हा शाखेतर्फे मधुरा लॉन्समध्ये सेवा सप्ताह व दीनदयाळ उपाध्याय जयंती पूर्वतयारीनिमित्ताने बैठक घेण्यात आली. त्यावेळी दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आमदार हरिभाऊ बागडे, इद्रिस मुलतानी, भाऊराव देशमुख, नामदेव गाडेकर, शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, लक्ष्मण औटे, डॉ. दिनेश परदेशी, सांडू पाटील लोखंडे, सुरेश बनकर, रेखा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थित होती. केंद्रीय दानवे यांनी विविध ठिकाणी शाखा उभारा, सामाजातील सर्वस्तरातील लोकांना त्यात सामावून घ्या त्यांना प्रतिनिधित्व द्या.
निवडणुकीत त्या-त्या समाजाचे मत मिळण्यास मदत होते, असा कानमंत्र दिला. पदवीधर निवडणुकीत पक्ष जो देईल तो उमेदवार असेल, असे सांगत त्यांनी एक टीम म्हणून ग्रामपंचायत, पदवीधरसह आगामी सर्व निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. ‘पदाधिकारी झालो, म्हणजे मोठा झालो, असे समजू नका’, असा सल्लाही त्यांनी दिला. आमदार बागडे यांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास राज्यातील आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. हॉस्पिटलआहे पण सुविधा नाही, त्यामुळे रुग्ण मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कार्यकर्ता हा भुईमुगासारखा हवा
पक्षात जो सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करतो, त्यालाच चांगला कार्यकर्ता म्हणतात. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता तसेच पदाधिकारी भुईमूग झाडासारखा असला पाहिजेत, कुठेही उपटला, तर खळखळ शेंगाच लागल्या पाहिजे, नुसताच गाजरासारखा एकटा नको, अशा खुमासदार शैलीत दानवे यांनी कार्यकर्त्यांना फटकारले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.