sushma andhare complaint against cm eknath shinde over his speech election commission Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

पराभवाच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून, प्रचार सभेत ते दंगल भडकवणारी भाषणे करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पराभवाच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून, प्रचार सभेत ते दंगल भडकवणारी भाषणे करत आहेत. एका मुख्यमंत्र्याला शोभणारी ही भाषा नाही, यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी (ता. आठ) पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी (ता. सात) छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ बजाजनगर येथे सभा झाली. सभेतील शिंदे यांच्या भाषणावर आक्षेप घेत अंधारे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरातील विकासावर बोलले पाहिजे.

किती उद्योग आणले, विकास कामे काय केली? महिलांच्या सुरक्षेसाठी काय केले? याची माहिती द्यायची सोडून ते औरंजेबाची कबर कोणी सजविली? असा प्रश्‍न करून जातीय तणाव निर्माण करण्याचे काम करत आहेत.

उद्या छत्रपती संभाजीनगरात दंगल झाली तर एकनाथ शिंदेच त्याला जबाबदार असतील. त्यामुळे आपण शिंदे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. आयोगाने देखील कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा असल्याचे अंधारे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट कोण लिहिते असा प्रश्‍न करत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्क्रिप्ट त्यांनी वाचू नये, असा टोला लगावला.

वाढीव मतांची आली संख्या कुठून?

मतदानानंतर तीन तासात वाढीव मतांची टक्केवारी जाहीर केली जाते, पण निवडणूक आयोगाने चार दिवसानंतर वाढीव मतांची टक्केवारी जाहीर केली आहे. त्यात दोन ते सात टक्क्यांपर्यंत मतदान वाढल्याचे स्पष्ट केले आहे, त्यावर सुषमा अंधारे यांनी शंका उपस्थित केली. दुसरीकडे मतदानाची टक्केवारी घटत आहे. बारामती मतदारसंघात फक्त ४७ टक्के मतदान झाले. ५३ टक्के लोकांच्या मतांचा विचार कोण करणार? असा प्रश्‍न अंधारे यांनी केला.

देवेंद्र फडणवीस नापास गृहमंत्री

निवडणुकीत मतदानासाठी पैसे वाटले जात असल्याचे व्हीडीओ समोर येऊन देखील निवडणूक आयोग कारवाई करत नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला. त्यात धाराशिव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सैनिकाचा खून तानाजी सावंत यांच्या गावगुंडांनी केला. निवडणुकीत अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे नापास, अकार्यक्षम फडणवीसांमुळे गेलेला बळी आहे, असे टीकास्त्र अंधारे यांनी सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT