mns mns
छत्रपती संभाजीनगर

'पाण्याचे नियोजन करा अन्यथा आयुक्तांच्या घराची नळजोडणी तोडू'; मनसेचा इशारा

शहरातील पाणीपुरवठा वाढावा याकरिता आयुक्त पांडेय यांना निवेदन दिले असल्याची माहिती जिल्हा संघटक बिपिन नाईक यांनी दिली आहे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: गेल्या काही वर्षापासून शहराला आठवड्यात एकदा पाणी येते. जायकवाडीत मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ मनपाच्या नियोजनशून्य कारभारमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसांत आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा करावा, पाणीपट्टी कमी करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. तसेच, पुढील दहा दिवसांत हा निर्णय न घेतल्यास मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या शासकीय निवासस्थानाचे कनेक्शन तोडण्यात येईल, असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.

शहरातील पाणीपुरवठा वाढावा याकरिता आयुक्त पांडेय यांना निवेदन दिले असल्याची माहिती जिल्हा संघटक बिपिन नाईक यांनी दिली आहे. नवीन योजनेचे स्वप्न दाखवून शहरवासीयांची दिशाभूल करण्यात येत आहे. चार दिवसांआड येणारे पाणी आता आठ दिवसांआड करण्यात आले आहे. असे असतानादेखील राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी वसूल करणारी मनपा म्हणून औरंगाबादचे नाव आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे दहा दिवसांत आठवड्यातून दोन दिवस पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी वैभव मिटकर, शहर उपाध्यक्ष राहुल पाटील, मनविसे जिल्हाध्यक्ष संकेत शेटे, प्रशांत दहिवाडकर, मनीष जोगदंडे आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

Hockey World Cup 2026: अर्जेंटिनाच्या विजयाने भारताला मिळाला सेकंड चान्स! उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी; जाणून घ्या समीकरण...

Marathi News Live Updates : आमच्या नोंदी सापडल्या म्हणून आरक्षण मागतोय- मनोज जरांगे

Samruddhi Expressway Accident: समृद्धीवर भीषण अपघात; एक ठार नऊ जखमी; सिंदखेड राजाजवळील घटना

SCROLL FOR NEXT