water Shortage Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद शहरात नागरिकांची पाण्यासाठी ओरड... पाणी द्या पाणी

महापालिकेत प्रशासकांकडे तासाभरात आली तीन शिष्टमंडळे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - शहरातील पाणीप्रश्‍न सोडविताना महापालिका अधिकाऱ्यांच्या घशालाही कोरड पडली आहे. सोमवारी (ता. नऊ) सकाळी तासाभरात तीन शिष्टमंडळांनी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन आम्हाला पाणी कधी मिळणार असा सवाल केला? शिष्टमंडळातील नागरिकांची समजूत काढताना प्रशासकांच्या नाकीनऊ आले. उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरात पाण्याविना नागरिकांचे हाल सुरू आहेत. अनेक भागात आठ-नऊ दिवसाला नळाला पाणी येत असल्याने नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने श्री. पांडेय यांची भेट घेतली. त्यानंतर हनुमान टेकडी परिसरातील नागरिकांचे शिष्टमंडळ आले.

शिष्टमंडळातील नागरिकांनी आम्हाला जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईचा त्रास होत आहे. बेकायदा नळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेकायदा नळांवर कारवाई करण्यात यावी. रात्री-अपरात्री पाणी येते, वेळा बदलण्यात याव्यात, अशी मागणी केली. त्यावर श्री. पांडेय यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले. आम्ही हक्काचे पाणीही मागू शकत नाही का? अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी नगरसेवक सचिन खैरे, गणू पांडे, प्रतिभा जगताप यांनी केले. त्यानंतर माजी सभापती दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखालील उल्कानगरी भागातील नागरिकांनी प्रशासकांची भेट घेतली. दीड महिन्यापासून या भागातील नागरिक त्रस्त आहेत. विश्‍वभारती कॉलनी येथील टाकी भरत नसल्यामुळे अडचण असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. समांतर बंद करताना तुम्ही कुठे होते? समांतर पाणी पुरवठा योजना रद्द झाली, त्यावेळी नागरिकांनी योजना रद्द करण्यास विरोध केला पाहिजे होता. त्यावेळी तुम्ही कुठे होतात? असा प्रश्‍न प्रशासकांनी शिष्टमंडळातील नागरिकांना केला. दोन वर्षांत तुम्हांला पहिल्यांदाच पाहत आहोत, असे प्रा. उमाकांत राठोड म्हणाले. त्यावर प्रशासकांनी विषय पाण्याचा आहे, त्यावरच बोला. मी दररोज कार्यालयात असतो, असे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना; संजू सॅमसन, जसप्रीत बुमराहला विश्रांती? कशी असेल प्लेईंग XI?

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला इडली-पोह्याचा कंटाळा आलाय? मग बनवा झटपट सुरतचा फेमस लोचो, लगेच नोट करा रेसिपी

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Panchang 19 September 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

SCROLL FOR NEXT