संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

आरटीईची प्रवेश प्रक्रिया यंदा होणार सुरळीत...कशी ते वाचा...

संदीप लांडगे

औरंगाबाद - आरटीईअंतर्गत बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गतच्या 25 टक्‍के राखीव जागांसाठी यंदा फेब्रुवारीत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तसेच तीन फेऱ्यांऐवजी प्रवेशासाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी यंदा नवीन नियमावली तयार करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. 

गेल्यावर्षी ढिसाळ नियोजन 
दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया तीन टप्यात लॉटरी काढण्यात येते. गेल्यावर्षी एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे शाळा सुरु झाल्यातरी प्रवेश प्रक्रिया सुरुच होत्या. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य पालकांना बसला होता. यामध्ये पालकांना सोयीच्या शाळा न मिळाल्यामुळे बहुसंख्य जागा रिक्तच राहील्या. त्यामुळे अनेक पालकांनी या प्रवेशाकडे कानाडोळा केला होता. त्या सर्व अडचणीवर तोडगा काढण्यासाठी यंदा एकदाच प्रवेशाची लॉटरी काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

त्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ठरावीक कालावधीसाठी मुदत देण्यात येईल. जितक्‍या जागा उपलब्ध आहेत. तेव्हढ्याच जागांची यादी तयार करण्यात येणार आहे. जागा रिक्त राहिल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रमाणे प्रक्रिया राबविण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया शाळा सुरु होण्याआगोदर म्हणजे मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शासनाकडुन देण्यात आले आहेत. 

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 
यंदा प्रक्रिया ऑनलाईन घेण्यात येणार आहे. मागील वेळी लॉटरीत नंबर लागल्यानंतरही केवळ कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. येत्या 11 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना आत्तापासूनच कागदपत्रांची जमवाजमव करुन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशासाठी अगोदर शाळांना उपलब्ध जागांची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर पालकांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. 

हेही वाचा - का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 
 
संभाव्य वेळापत्रक 
आरटीई प्रवेशपात्र शाळा व नवीन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे बीईओंकडून पडताळणी 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात येईल. त्यानंतर पालकांनी 11 ते 29 फेब्रुवारीदरम्यान ऑनलाईन नोंदणी करायची आहे. 11 व 12 मार्चला लॉटरी सोडत काढण्यात येईल. लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या पालकांनी 16 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान बीईओकडे जावून कागदपत्रांची पडताळणी करुन शाळेत जावून प्रवेश निश्‍चित करायचे आहे. 13 एप्रिल ते 22 मेपर्यंत प्रवेशाच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT